शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऑनलाइन वर्ग घेण्याच्या पूर्वीच सूचना दिलेल्या असतानादेखील अनेकजणांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने मुख्य परिसर व ...

औरंगाबाद : ऑनलाइन वर्ग घेण्याच्या पूर्वीच सूचना दिलेल्या असतानादेखील अनेकजणांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने मुख्य परिसर व उपपरिसरातील सर्व विभागप्रमुख व अधिव्याख्यात्यांना पुन्हा एकदा सूचित केले आहे की, ऑनलाइन प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांचे वर्ग घ्या व ४ एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करा.

कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार नुकतेच सुरू झालेले विद्यापीठ व महाविद्यालयीन वर्ग बंद करावे लागले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन वर्ग घेण्याचे पूर्वीच आदेश दिलेले आहेत; परंतु अनेक अधिव्याखाता ऑनलाइन वर्ग घेत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे पदव्युत्तर वर्गाच्या एप्रिलमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन

विद्यापीठाने केले आहे. तत्पूर्वी ४ एप्रिलपर्यंत ऑनलाइन वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे

प्रशासनाने कळविले आहे.

५० टक्के कर्मचारी उपस्थिती अनिवार्य

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ५० टक्के कर्मचारी उपस्थितीबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह चालू राहतील. सदर उपाययोजना ३१ मार्चपर्यंत अंमलात राहाणार असून या काळात विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील अधिनस्थ एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या विभागात एकच कर्मचारी कार्यरत आहे. अशा विभागप्रमुखांनी कामाच्या निकडीनुसार निर्णय घ्यावा.

चौकट.....

कर्मचारी- अधिकाऱ्यांची चलाखी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील ‘बायोमेट्रिक’ हजेरी बंद करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेत कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांसह अनेक विभाग व कार्यालयांतील नियमित कर्मचारी व अधिकारी वेळेचे बंधन पाळत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. काहीजण दुपारनंतर कार्यालयात येतात, तर काही जण कार्यालयात येऊन मध्येच गायब होतात. काहीजणांचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत चालले असते. कोणीही हालचाल रजिस्टवर नोंदी करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ

अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन वास्तव तपासण्याचा निर्णय घेतला आहे.