शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘वॉर रुम’मध्ये तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: May 3, 2016 00:02 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळ व टंचाई निवारणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘वॉर रुम’ (नियंत्रण कक्ष) स्थापन केला आहे.

पाणी द्या : ७ दिवसांत १५५ तक्रारी; ग्रामीण भागातून २० तक्रारी दाखल...लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळ व टंचाई निवारणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘वॉर रुम’ (नियंत्रण कक्ष) स्थापन केला आहे. गेल्या सात दिवसांत या कक्षात १५५ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील १३५ तक्रारी शहरातील असून, २० तक्रारी ग्रामीण भागातील आहेत. बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा सुरळीत नसल्याच्याच आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. रेल्वेने तसेच स्थानिक स्त्रोतांतून पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या अनेक तक्रारी नियंत्रण कक्षात गुदरल्या आहेत. २५ एप्रिल ते १ मे या सात दिवसांच्या कालावधीत एकूण १५५ तक्रारी आल्या आहेत. २५ एप्रिल रोजी २०, २६ रोजी ५०, २७ रोजी २१, २८ रोजी २०, २९ रोजी १५, ३० रोजी १४ आणि १ मे रोजी १५ अशा एकूण १५५ तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींवर स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण १४९ तक्रारींवर निर्णय घेण्यात आला आहे. केवळ ६ तक्रारी प्रलंबित आहेत. १५५ पैकी शहरी भागातील १३५ तक्रारी आहेत. या सर्व तक्रारी पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने होत्या. ग्रामीण भागातील २० तक्रारींपैकी १५ तक्रारी पाणीपुरवठा तर जनावरांना चारा नसल्याच्या संदर्भात तीन तक्रारी आहेत. अधिग्रहण व शेतकऱ्यांची प्रत्येकी एक तक्रार होती. या तक्रारींबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम २४ तास कार्यरत आहे. त्यासाठी ३ शिफ्टमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नियमितपणे जनतेच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्यात येत आहेत. २५ एप्रिल ते १ मे दरम्यान दूरध्वनी क्रमांकावरून १५५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १४९ तक्रारी सोडविण्यात आल्या असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. पाणी, चारा, रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार, अधिग्रहण, अन्नसुरक्षा आदींबाबत तक्रारी असल्यास थेट वॉर रुममधील टोल १ फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सूचित केले आहे. (प्रतिनिधी)१४९ तक्रारींवर तोडगा : सहा तक्रारी प्रलंबित...२५ एप्रिल ते १ मे या सात दिवसांच्या कालावधीत एकूण १५५ तक्रारी दूरध्वनी क्रमांक : ०२३८२-२२०२०४ तसेच व्हॉटस् अ‍ॅप नं. : ८४४६४५१०७७ वर या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील केवळ ६ तक्रारी प्रलंबित असून, १४९ तक्रारींवर निर्णय घेऊन तक्रारकर्त्यांना दिलासा देण्यात आला आहे. १५५ पैकी १३५ तक्रारी शहरी भागातील तर केवळ २० तक्रारी ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागातील सर्वच तक्रारी पाणीपुरवठ्यासंदर्भात आहेत. ग्रामीण भागातील १५ तक्रारी पाणीपुरवठ्यावर होत्या.तक्रारींचे निवारण...जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली या तक्रारींवर वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीचे निराकरण करण्यात येत आहे. तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर तक्रारदारांचे अभिप्रायही प्राप्त होत आहेत. या उपक्रमास नागरिकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.दूरध्वनी क्रमांक आणि व्हॉटस् अ‍ॅपचा नंबर तक्रारकर्त्यांसाठी २४ तास खुला असून, या दोन्ही क्रमांकावर तक्रार दिल्यास अगदी काही तासांमध्ये तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रयत्न या कक्षातून केले जात आहेत.