शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

केबीसीविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरू

By admin | Updated: July 20, 2014 01:00 IST

औरंगाबाद : हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या केबीसी कंपनीविरुद्ध गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा आर्थिक गुन्हे शाखेकडे ओघ सुरूझाला आहे.

औरंगाबाद : हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या केबीसी कंपनीविरुद्ध गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा आर्थिक गुन्हे शाखेकडे ओघ सुरूझाला आहे. लवकरच या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त अविनाश आघाव यांनी सांगितले. कमीत कमी दिवसांमध्ये गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिकच्या केबीसी या कंपनीने राज्यभरातील हजारो गोरगरीब नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले आणि आता कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या कंपनीने केलेला घोटाळा हजारो कोटी रुपयांचा असल्याचे समोर येत आहे. केबीसीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपली शेतीवाडी, दागदागिने व इतर मालमत्ता विकून किंवा गहाण ठेवून गुंतवणूक केली आहे. कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे हे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. शनिवारी अनेक तक्रारदारांनी केबीसीविरुद्ध तक्रार घेऊन आर्थिक गुन्हे शाखा गाठली. या सर्व नागरिकांच्या तक्रारी घेण्यात आलेल्या आहेत. सर्वांना पुरावे आणून देण्याचे सांगण्यात आले आहे. सर्वांच्या तक्रारी आणि पुरावे गोळा झाल्यानंतर लवकरच केबीसीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल, असे अविनाश आघाव म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिक ‘टार्गेट’केबीसीने शहरी भागाऐवजी ग्रामीण भागातील गोरगरीब, भोळ्याभाबड्या नागरिकांना ‘टार्गेट’ केले होते, असे आता समोर येऊ लागले आहे. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्या ग्रामीण भागातील एजंटांना कंपनीने भरभरून परतावे दिले. या परताव्यातून एजंटांना आलिशान चारचाकी वाहने घ्यायला लावली. शिवाय विदेशात ट्रीपवर नेले.या एजंटांची केबीसीमुळे झालेली प्रगती पाहून खेड्यापाड्यातील गोरगरीब, अडाणी नागरिकांना केबीसीची भुरळ पडली. जे कंपनीलाही अपेक्षित होते. त्यामुळेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात केबीसीमध्ये गुंतवणूक झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मावसगव्हाण या अख्ख्या गावाने केबीसीत गुंतवणूक केल्याचे काल ‘लोकमत’ने समोर आणले होते. मावसगव्हाणप्रमाणेच जिल्ह्यात अशी अनेक गावे असल्याचे आता समोर येत आहे.