शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शेडनेटधारकांना नुकसान भरपाई द्या

By admin | Updated: May 14, 2014 23:57 IST

जालना: जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पाऊस व गारपिटीमुळे १६९ शेडनेटधारक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

जालना: जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पाऊस व गारपिटीमुळे १६९ शेडनेटधारक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खा. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात २३ फेबु्रवारी ते १० मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीट झाली. त्यात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेडनेटसह त्यातील भाजीपाला व इतर पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामुळे शेडनेटधारक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मुळात या शेतकर्‍यांनी मोठी ओढाताण करीत, उधार-उसनवारी करीत, शेडनेट उभारल्या. मोठ्या जिद्दीने त्यातून भाजीपाल्यासह अन्य पिके फुलविली. त्यातून काही पदरात पडेल, असे अपेक्षित असतांना या शेतकर्‍यांना मोठी झळ पोहोचली आहे, असे दानवे म्हणाले. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, त्यात शेडनेटधारकांचा समावेश नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेडनेटधारक शेतकर्‍यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी) आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारने मदतीचा निर्णय जाहीर केला. परंतु त्यात शेडनेटधारकांचा उल्लेख नाही. मुळात शेडनोटधारकांचे पन्नासटक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच सरकारने खास बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घ्यावा व मदत जाहीर करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.