शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

भरपाई मोठी; पदरात केवळ अडीच कोटी !

By admin | Updated: February 1, 2015 00:39 IST

मोहनदास साखरे ,मांडवा दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. मात्र, २३ कोटींपैकी केवळ अडीच कोटींची मदत

मोहनदास साखरे ,मांडवा दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. मात्र, २३ कोटींपैकी केवळ अडीच कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. तलाठी कार्यालये, बँका, तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवत शेतकरी टाहो फोडत आहेत. मात्र, दुष्काळातही यंत्रणेचा कारभार ढिम्मच आहे. खुद्द पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याच तालुक्यात ही धक्कादायक स्थिती आहे, त्यामुळे इतर तालुक्यांचे न विचारलेलेच बरे !याद्याच पोहचल्या नाहीतपरळी तालुक्यासाठी एकूण १३ कोटी ३९ लाख ६२ हजार २१८ इतकी अनुदान रक्कम उपलब्ध झाली. पैकी केवळ १७ गावांमध्ये २ कोटी ५६ लाख ५४ हजार ४९५ इतकी मदत शेतकऱ्यांपुढे पोहचली. अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या क्रमांकांसह याद्या तहसील कार्यालयात जाणे अपेक्षित होते. मात्र, तलाठी याद्या शोधण्यातच मग्न आहेत. २९ तलाठी सज्जांवर १९ जण काम पाहत आहेत. त्यामुळे याद्या गोळा करण्याचे काम धिम्म्या गतीने सुरू आहे.२६ जानेवारीपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळणे अपेक्षित होते.४मात्र, पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच या सूचनेला अधिकाऱ्यांनी खोडा घातला.४२०६ गावांमधील ५६ हजार ९३२ शेतकऱ्यांपैकी केवळ ४ हजार ५२ जणांना भरपाई मिळाली. अद्यापही ५२ हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकऱ्यांच्या याद्या मागविणे सुरू आहे. हलगर्जी करणाऱ्या तलाठ्यांवर योग्य ती कारवाई करू. - सविता चौधर, उपविभागीय अधिकारी, परळी