शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राट रद्द करण्याची धमकी देताच कंपनी ताळ्यावर

By admin | Updated: August 8, 2014 01:26 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला (एसीडब्ल्यूयूसीएल) कंत्राट रद्द करण्याचे पत्र गेल्या गुरुवारी दिले होते.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला (एसीडब्ल्यूयूसीएल) कंत्राट रद्द करण्याचे पत्र गेल्या गुरुवारी दिले होते. त्या धमकीवजा पत्रामुळे कंपनीचे संचालक ताळ्यावर आल्यामुळे आज समांतर जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला, असे म्हणावे लागेल. ३० एप्रिल २०१३ पासून सुरू झालेला समांतरचा पत्रप्रपंच आज थांबला. पीपीपी मॉडेलवरील ही योजना असल्यामुळे नफा-तोट्याचा विचार न करता सुरू करण्यामागे एसीडब्ल्यूयूसीएल कंपनी तयार कशामुळे झाली, हे कंपनीने सांगितले नाही. महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीची योजना २०० कोटी रुपयांऐवजी ४६२ कोटी ८० लाख रुपयांनी महागली आहे. ही रक्कम देणार कोण, योजनेला विलंब कुणामुळे झाला, या सगळ्यांवर परिणामकारक तोडगा काय, हे गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे समांतरचे काम हवेत केलेला गोळीबार आहे की, आचारसंहिता लागण्यापूर्वी मनपाने उडविलेला बार आहे हे कळण्यास मार्ग नाही. महापौर कला ओझा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कशासाठी घेतला, हा प्रश्नआहे. १ सप्टेंबरपासून खाजगीकरणशहरातील पाणीपुरवठ्याची देखभाल, दुुरुस्ती व वितरण, वीज बिल भरण्याची जबाबदारी एसीडब्ल्यूयूसीएलकडे जाणार आहे. कंपनीकडे मनपाचे ३०० व स्वत:चे ३०० असे ६०० कर्मचारी असतील. यांचे वेतन कंपनी करील. सध्या कंपनी ६५ अभियंत्यांकडून काम करून घेत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात युतीचे सरकार येईल. मग योजनेला शासनाकडून अनुदान वाढवून घेऊ, तसेच केंद्र शासनाकडेही अनुदानासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्याला मनपा सहकार्य करील. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर योजना महाग झाल्यामुळे पडणारा बोजा अशा पद्धतीने हलका करण्याचा विचार कंपनीने बोलून दाखविला. राज्यात कुणाचे सरकार येणार हे येणारा काळ सांगेल. मात्र, मनपा आणि कंपनीच्या मनसुब्यांत औरंगाबादच्या नागरिकांचे हाल होऊ नयेत, ही अपेक्षा. काम कसे?समांतर जलवाहिनी प्रकरणात न्यायालयीन लढा देणारे राजेंद्र दाते म्हणाले, मनपा आणि ठेकेदार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. जनहित याचिकाप्रकरणी न्यायालयाने राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. अर्जदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे. याप्रकरणी अजून सुनावणीच झालेली नाही. असे असताना पालिकेने काम सुरू करण्यासाठी आदेश देणे म्हणजे यामध्ये गौडबंगाल आहे.