शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्त रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:03 IST

शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत दोन दिवसांपासून १ वाजेनंतर (दवाखाने आणि औषधी दुकाने वगळता) सर्व बाजारपेठ ...

शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत दोन दिवसांपासून १ वाजेनंतर (दवाखाने आणि औषधी दुकाने वगळता) सर्व बाजारपेठ बंद ठेवली जात आहे. पवित्र रमजान महिन्याच्या उपवासामुळे फळे विक्रेत्यांना केवळ सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत विक्री परवानगी देण्यात आली आहे. ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीसाठी शहरात ६२ ठिकाणी नाकाबंदी, फिक्स पॉइंट लावले आहेत. प्रत्येक पॉइंटवर एक अधिकारी आणि दहा कर्मचारी, तसेच वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी तैनात आहेत. पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी सोमवारी दुपारी शहरात फिरून ‘ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी कशी केली जाते याची पाहणी केली. दुपारी १ वाजता ते छावणी परिसरातील लिटल फ्लॉवर शाळेजवळील फिक्स पॉइंटवर गेले. तेव्हा तेथे १० कर्मचारी त्यांना दिसले नाहीत. काही पॉइंटवर त्यांना एक अधिकारी आणि बारा ते चौदा कर्मचारी तैनात असल्याचे दिसले. ही बाब त्यांना खटकली. याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ठाणेदार हे प्रत्येक चौकात सोयीनुसार कर्मचारी फिक्स पॉइंटच्या कामासाठी लावतात असे त्यांना समजले. तेव्हा ज्या ठाण्याचे निरीक्षक फिक्स पॉइंटवर पुरेसे कर्मचारी नसल्याचे कारण देतात त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाला संलग्न करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिल्याचे सूत्राने सांगितले.

===कोट

‘ब्रेक द चेन’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. काही पॉइंटवर अपुरे कर्मचारी, तर काही ठिकाणी एक अधिकारी १२ ते १४ कर्मचारी असे चित्र पाहायला मिळाले. काही कारणास्तव ठाण्यात अपुरे कर्मचारी असतील तर मुख्यालयाचे मनुष्यबळ मागवा, अशा सूचना करण्यात आल्या.

= डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त.

------------------------------पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त कारवाईत सहभागी

परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे हे हर्सूल टी-पॉइंट येथे, छावणी विभागाचे सहायक आयुक्त विवेक सराफ, एसीपी सुरेश वानखेडे विविध चौकातील नाकाबंदीत सहभागी झाले.

----------------------------चौकट

सावलीसाठी मंडप आणि पिण्याचे पाणी

उन्हाचा पारा चढत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने नाकाबंदीच्या प्रत्येक पॉइंटवर मंडप लावून सावली केली. शिवाय थंडगार पाण्याचे जार उपलब्ध केले. याचा फार मोठा दिलासा नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना मिळाला.