शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

अकार्यक्षमता झाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

उस्मानाबाद : गत पाच वर्षातील आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर टीका केली आहे़

उस्मानाबाद : गत पाच वर्षातील आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर टीका केली आहे़ शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या नादात काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात दुर्दशा झाली असून, दोन मतदार संघात काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे़ तर चव्हाण यांच्या विरोधात जवळपास ७० टक्के लोकांनी मतदान केले असून, मतविभाजनामुळे ते निवडूण आले आहेत़ अन्यथा त्यांना यावेळी घरी बसावे लागले असते, असा टोमणाही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रत्युत्तरादाखल काढलेल्या पत्रकात मारला आहे़आ़ चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या़ चव्हाण यांच्या आरोपांचे खंडण करीत बिराजदार यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले, तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उजनी पाणीपुरवठा योजना व २५ टीएमसी पाणी योजनेस मंजुरी मिळाली आहे़ मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेते असलेले मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे असताना रेटा लावून धरला असता तर २५ टीएमसी पाण्याची योजना पूर्णत्वास आली असती़ मात्र, योजनेच्या किंमतीत दरवर्षी वाढ होत होती़ तेवढा पैसाही उपलब्ध करून दिला नाही़ आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे अर्थ व जलसंधारण खाती असल्यामुळे ही योजना रखडल्याचे सांगत आ़ चव्हाण हे जबाबदारी झटकत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे़जिल्हा बँकेलाही शासकीय मदत मिळवून देण्यासाठी गप्प का राहिलात ? बँकेतील जिल्हा परिषदेची खाती इतरत्र वळविताना आपण गप्प का राहिलात ? असे सवालही उपस्थित केले आहेत़शिवाय तुळजाभवानी कारखान्याबाबत, लोकमंगलला कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत चुकीची विधाने करण्यात आल्याचेही बिराजदार यांनी पत्रकात म्हटले आहे़ तसेच उजनी पाणीपुरवठा योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ६० कोटी दिल्याचे सांगितले जाते़ मात्र, आजपर्यंत पूर्ण रक्कम पालिकेला मिळाली नाही़ उजनी पाणीपुरवठा योजनेमुळे उस्मानाबादकरांचा पाणीप्रश्न मिटला असून, खानापूर येथे पंप हाऊस सुरू झाल्यानंतर शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)