शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सुरतहून यायचे, चोरी करून जायचे

By admin | Updated: March 1, 2016 00:50 IST

औरंगाबाद : गर्दीच्या ठिकाणी सावज हेरून ठेवायचे... टोळीतील बालकांनी त्याला घेराव घालायचा... समोरून असलेल्या एकाने त्याला काही तरी बोलण्यात गुंतवून ठेवायचे

औरंगाबाद : गर्दीच्या ठिकाणी सावज हेरून ठेवायचे... टोळीतील बालकांनी त्याला घेराव घालायचा... समोरून असलेल्या एकाने त्याला काही तरी बोलण्यात गुंतवून ठेवायचे आणि पाठीमागून दुसऱ्या बालकाने खिशातील मोबाईल लंपास करायचा, अशी पद्धत वापरून मोबाईल चोरीसाठी आठवडी बाजार करणारी ही कुख्यात टोळी क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी रात्री खोकडपुरा (सामाजिक न्याय भवन परिसर) भागातून जेरबंद केली. आठ जणांच्या या टोळीत चार अल्पवयीन मुले आहेत. अनिल महत्तो, सोनू रामजीवन महत्तो, शेख जुबेर शेख वरसल्ली, विजय विनोद महत्तो (सर्व रा. महाराजपूर, जि. साहबगंज, झारखंड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारी न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी या टोळीकडून दोन हजार २८० रुपयांची रोकड, ७२ हजार रुपयांचे ११ मोबाईल, दोन चाकू, मिरचीपूड आणि दोरी असे साहित्य जप्त केले आहे. सर्व चोरटे हे अशिक्षित आहेत, अशी माहिती तपास अधिकारी फौजदार संजय अहिरे यांनी दिली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मूळ झारखंड राज्यातील असलेल्या या टोळीचा मुक्काम सुरतला असतो. ते प्रत्येक शनिवारी रात्री सुरतहून निघायचे, रविवारी सकाळी शहरात उतरल्यावर दुपारपर्यंत बसस्थानकात फिरायचे. तेथून ते रविवार बाजार, जाधववाडी, भाजीमंडई इ. गर्दीची ठिकाणे ‘टार्गेट’ करून मोबाईल, पाकिटांची चोरी करायचे. विशेष म्हणजे ही टोळी काम फत्ते झाले की लगेच शहर सोडायची. त्यामुळे पोलिसांना या टोळीबाबत माहिती नव्हती.