शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जिल्हाधिका-यांचा बूट गेला चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:11 IST

महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात स्मार्टसिटीच्या बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी नवल कि शोर राम यांचा बूट गुरुवारी चोरीला गेला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात स्मार्टसिटीच्या बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी नवल कि शोर राम यांचा बूट गुरुवारी चोरीला गेला. एकदम ‘अफलातून’ हा प्रकार घडल्यामुळे संशोधन केंद्रात असलेल्या महापौरांपासून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय बैठकीचा शेवट असा बूटचोरीने झाल्यामुळे अनेकांचे चेहरे पडले.बूट न सापडल्यामुळे जिल्हाधिकारी सॉक्ससह कारमधून निवासस्थानी गेले. त्यांनादेखील हा प्रकार पचनी पडला नाही; परंतु शेवटी घटना घडल्यामुळे त्यांनीदेखील खूप काही प्रतिक्रिया दिल्या नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात स्मार्टसिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रात जाण्यापूर्वी पादत्राणे काढून जावे लागत असल्याने सर्वांची पादत्राणे बाहेरच होती.त्या बैठकीला मनपाचे प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्ष उद्योग प्रधान सचिव सुनील पोरवाल हे गेल्यानंतर उर्वरित सर्व अधिकारी, मनपाचे पदाधिकारी व सादरीकरण करणारे एक शिष्टमंडळ बाहेर पडले. सर्व जण निघून गेल्यानंतर जिल्हाधिकारी, महापौर, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता पादत्राणे घालून जाण्याच्याघाईत होते. त्यावेळी जिल्हाधिकाºयांचा बूट चोरीला गेल्याचे समोर आले.