शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निदर्शनेही केली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.जिल्ह्यातील दलित, आदिवासी, पारधी, मांग, महार या समाजातील भूमिहिनांनी गायरान, फॉरेस्टच्यो जमिनी वहितीखाली आणून आपली उपजिविका भागवित आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार उभ्या पिकांचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. परंतु, शासन आणि प्रशासनही याकडे डोळेझाक करीत आहे. वारंवार पाठपुरवा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने १८ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्यापासून मोर्चा निघाला. हा मोर्चा शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्यानंतर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना बजरंग ताटे यांनी केसरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, सरकारी गायरान जमीन व फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहे. सदरील जागा त्या-त्या कुटुंबाच्या नावे करावी आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या. मोर्चामध्ये भाई बजरंग ताटे, माया शिंदे, यशवंत फडतरे, हनुमंत पाटुळे, विक्रम शिंदे, वाल्मिक सगट, मंगल सोनटक्के, दादाराव कांबळे, नवनाथ शिंदे, तारामती कसबे, राजाभाऊ मस्के, सुमन काळे, खुदबुद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)