शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निदर्शनेही केली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.जिल्ह्यातील दलित, आदिवासी, पारधी, मांग, महार या समाजातील भूमिहिनांनी गायरान, फॉरेस्टच्यो जमिनी वहितीखाली आणून आपली उपजिविका भागवित आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार उभ्या पिकांचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. परंतु, शासन आणि प्रशासनही याकडे डोळेझाक करीत आहे. वारंवार पाठपुरवा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने १८ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्यापासून मोर्चा निघाला. हा मोर्चा शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्यानंतर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना बजरंग ताटे यांनी केसरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, सरकारी गायरान जमीन व फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहे. सदरील जागा त्या-त्या कुटुंबाच्या नावे करावी आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या. मोर्चामध्ये भाई बजरंग ताटे, माया शिंदे, यशवंत फडतरे, हनुमंत पाटुळे, विक्रम शिंदे, वाल्मिक सगट, मंगल सोनटक्के, दादाराव कांबळे, नवनाथ शिंदे, तारामती कसबे, राजाभाऊ मस्के, सुमन काळे, खुदबुद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)