शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निदर्शनेही केली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.जिल्ह्यातील दलित, आदिवासी, पारधी, मांग, महार या समाजातील भूमिहिनांनी गायरान, फॉरेस्टच्यो जमिनी वहितीखाली आणून आपली उपजिविका भागवित आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार उभ्या पिकांचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. परंतु, शासन आणि प्रशासनही याकडे डोळेझाक करीत आहे. वारंवार पाठपुरवा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने १८ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्यापासून मोर्चा निघाला. हा मोर्चा शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्यानंतर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना बजरंग ताटे यांनी केसरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, सरकारी गायरान जमीन व फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहे. सदरील जागा त्या-त्या कुटुंबाच्या नावे करावी आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या. मोर्चामध्ये भाई बजरंग ताटे, माया शिंदे, यशवंत फडतरे, हनुमंत पाटुळे, विक्रम शिंदे, वाल्मिक सगट, मंगल सोनटक्के, दादाराव कांबळे, नवनाथ शिंदे, तारामती कसबे, राजाभाऊ मस्के, सुमन काळे, खुदबुद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)