शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

मुख्य जलवाहिनीच्या कामाचा नारळ फुटणार दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत टाकण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचा नारळ दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता ...

औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत टाकण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचा नारळ दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता आहे. मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी कंत्राटदार कंपनी नक्षत्रवाडी किंवा पैठण यांपैकी एका ठिकाणी फॅक्टरी सुरू करणार आहे. त्याचे पाईप येथेच तयार करण्यात येतील. जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. साधारणत: दिवाळीनंतर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होईल, अशी शक्यता महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी वर्तविली.

शहरासाठी शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे काम करीत आहे. प्राधिकरणाने हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला ४ फेब्रुवारीपासून काम दिले आहे. शहरात जलकुंभ उभारणे, अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, आदी कामे सुरू असली तरी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या अंतरातील मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. नवीन योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. या काळात शहराची पाण्याची मागणी वाढत आहे. काही प्रमाणात त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी नऊ कोटी रुपये खर्चून आवश्यक त्या सुधारणा, नवीन पंप खरेदी केली जाणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाली तरी जुनी योजना कार्यान्वित राहील. त्यामुळे जुन्या योजनेवरील खर्च वाया जाणार नाही, असा दावा प्रशासकांनी केला.