शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मुख्य जलवाहिनीच्या कामाचा नारळ फुटणार दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत टाकण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचा नारळ दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता ...

औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत टाकण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचा नारळ दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता आहे. मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी कंत्राटदार कंपनी नक्षत्रवाडी किंवा पैठण यांपैकी एका ठिकाणी फॅक्टरी सुरू करणार आहे. त्याचे पाईप येथेच तयार करण्यात येतील. जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. साधारणत: दिवाळीनंतर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होईल, अशी शक्यता महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी वर्तविली.

शहरासाठी शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे काम करीत आहे. प्राधिकरणाने हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला ४ फेब्रुवारीपासून काम दिले आहे. शहरात जलकुंभ उभारणे, अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, आदी कामे सुरू असली तरी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या अंतरातील मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. नवीन योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. या काळात शहराची पाण्याची मागणी वाढत आहे. काही प्रमाणात त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी नऊ कोटी रुपये खर्चून आवश्यक त्या सुधारणा, नवीन पंप खरेदी केली जाणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाली तरी जुनी योजना कार्यान्वित राहील. त्यामुळे जुन्या योजनेवरील खर्च वाया जाणार नाही, असा दावा प्रशासकांनी केला.