शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नारळ फुटला रस्त्याचा; वाद सुरू झाला श्रेयाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:04 IST

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको ते जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकमार्गे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात आ. अतुल ...

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको ते जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकमार्गे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात आ. अतुल सावे यांच्या हस्ते नारळ फोडून बुधवारी करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महापालिकेची परवानगी नव्हती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरातील सर्व रस्त्यांचे संयुक्त भूमिपूजन १२ डिसेंबर रोजी केल्यानंतर बुधवारी पुन्हा भाजपाने कुदळ मारून नारळ फोडल्यामुळे शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना- भाजपात श्रेयवाद उफाळून आला आहे. पाच वर्षांनंतर जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी मुहूर्त लागला असून, त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. गेल्या सरकारने त्या रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर केले. मनपाने निविदेसह वर्कऑर्डर मंजूर केली नाही, असा आरोप भाजपाने मध्यंतरी केला होता. रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या अनुषंगाने मालमत्ता पाडल्या. मात्र, रुंदीकरण रखडले. पावसाळ्यात त्या रस्त्यावरून जयभवानीनगर, विश्रांतीनगर, राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात जाणे नागरिकांना यातना देणारे ठरले. बुधवारी भाजपाने केलेल्या भूमिपूजनाप्रसंगी प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, मनीषा मुंडे, गोविंद केंद्रे, कैलास गायकवाड, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, संजय बोराडे, रामेश्वर दसपुते, ताराचंद गायकवाड, अर्जुन गवारे यांच्यासह रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर हरविंदरसिंग बिंद्रा यांची उपस्थिती होती.

भाजपाकडून लाजिरवाणा प्रकार

भाजपाने बुधवारी केलेले भूमिपूजन म्हणजे लोकांच्या लेकरांना स्वत:चे नाव देण्याचा लाजिरवाणा प्रकार असल्याची खोचक टीका शिवसेना पूर्व मतदारसंघ संघटक राजू वैद्य यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते १५२ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन झालेले असताना भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत भूमिपूजनाचा घाट घातला. प्रशासनातील कोणताही अधिकारी सोबत नसताना बालिशपणे या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार करीत आहेत.

शहरात आचारसंहिता नाही

सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शहरात नाही; परंतु जर कुणी शहरात एखादे भूमिपूजन केले असेल आणि त्याचा संबंध थेट एखाद्या ग्रामपंचायतीशी असेल, तर मात्र आचारसंहितेचे उल्लंघन झाले, असे म्हणता येईल.