शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

नारळ फुटला रस्त्याचा; वाद सुरू झाला श्रेयाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:04 IST

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको ते जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकमार्गे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात आ. अतुल ...

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको ते जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकमार्गे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात आ. अतुल सावे यांच्या हस्ते नारळ फोडून बुधवारी करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महापालिकेची परवानगी नव्हती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरातील सर्व रस्त्यांचे संयुक्त भूमिपूजन १२ डिसेंबर रोजी केल्यानंतर बुधवारी पुन्हा भाजपाने कुदळ मारून नारळ फोडल्यामुळे शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना- भाजपात श्रेयवाद उफाळून आला आहे. पाच वर्षांनंतर जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी मुहूर्त लागला असून, त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. गेल्या सरकारने त्या रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर केले. मनपाने निविदेसह वर्कऑर्डर मंजूर केली नाही, असा आरोप भाजपाने मध्यंतरी केला होता. रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या अनुषंगाने मालमत्ता पाडल्या. मात्र, रुंदीकरण रखडले. पावसाळ्यात त्या रस्त्यावरून जयभवानीनगर, विश्रांतीनगर, राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात जाणे नागरिकांना यातना देणारे ठरले. बुधवारी भाजपाने केलेल्या भूमिपूजनाप्रसंगी प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, मनीषा मुंडे, गोविंद केंद्रे, कैलास गायकवाड, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, संजय बोराडे, रामेश्वर दसपुते, ताराचंद गायकवाड, अर्जुन गवारे यांच्यासह रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर हरविंदरसिंग बिंद्रा यांची उपस्थिती होती.

भाजपाकडून लाजिरवाणा प्रकार

भाजपाने बुधवारी केलेले भूमिपूजन म्हणजे लोकांच्या लेकरांना स्वत:चे नाव देण्याचा लाजिरवाणा प्रकार असल्याची खोचक टीका शिवसेना पूर्व मतदारसंघ संघटक राजू वैद्य यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते १५२ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन झालेले असताना भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत भूमिपूजनाचा घाट घातला. प्रशासनातील कोणताही अधिकारी सोबत नसताना बालिशपणे या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार करीत आहेत.

शहरात आचारसंहिता नाही

सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शहरात नाही; परंतु जर कुणी शहरात एखादे भूमिपूजन केले असेल आणि त्याचा संबंध थेट एखाद्या ग्रामपंचायतीशी असेल, तर मात्र आचारसंहितेचे उल्लंघन झाले, असे म्हणता येईल.