शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नारळ फुटला रस्त्याचा; वाद सुरू झाला श्रेयाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:04 IST

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको ते जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकमार्गे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात आ. अतुल ...

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको ते जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकमार्गे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात आ. अतुल सावे यांच्या हस्ते नारळ फोडून बुधवारी करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महापालिकेची परवानगी नव्हती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरातील सर्व रस्त्यांचे संयुक्त भूमिपूजन १२ डिसेंबर रोजी केल्यानंतर बुधवारी पुन्हा भाजपाने कुदळ मारून नारळ फोडल्यामुळे शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना- भाजपात श्रेयवाद उफाळून आला आहे. पाच वर्षांनंतर जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी मुहूर्त लागला असून, त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. गेल्या सरकारने त्या रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर केले. मनपाने निविदेसह वर्कऑर्डर मंजूर केली नाही, असा आरोप भाजपाने मध्यंतरी केला होता. रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या अनुषंगाने मालमत्ता पाडल्या. मात्र, रुंदीकरण रखडले. पावसाळ्यात त्या रस्त्यावरून जयभवानीनगर, विश्रांतीनगर, राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात जाणे नागरिकांना यातना देणारे ठरले. बुधवारी भाजपाने केलेल्या भूमिपूजनाप्रसंगी प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, मनीषा मुंडे, गोविंद केंद्रे, कैलास गायकवाड, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, संजय बोराडे, रामेश्वर दसपुते, ताराचंद गायकवाड, अर्जुन गवारे यांच्यासह रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर हरविंदरसिंग बिंद्रा यांची उपस्थिती होती.

भाजपाकडून लाजिरवाणा प्रकार

भाजपाने बुधवारी केलेले भूमिपूजन म्हणजे लोकांच्या लेकरांना स्वत:चे नाव देण्याचा लाजिरवाणा प्रकार असल्याची खोचक टीका शिवसेना पूर्व मतदारसंघ संघटक राजू वैद्य यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते १५२ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन झालेले असताना भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत भूमिपूजनाचा घाट घातला. प्रशासनातील कोणताही अधिकारी सोबत नसताना बालिशपणे या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार करीत आहेत.

शहरात आचारसंहिता नाही

सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शहरात नाही; परंतु जर कुणी शहरात एखादे भूमिपूजन केले असेल आणि त्याचा संबंध थेट एखाद्या ग्रामपंचायतीशी असेल, तर मात्र आचारसंहितेचे उल्लंघन झाले, असे म्हणता येईल.