शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील ६१४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘नारळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:09 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिका प्रशासनाने तब्बल ७५० कंत्राटी कर्मचारी घेतले होते. या कर्मचाऱ्यांची सेवा दि. ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिका प्रशासनाने तब्बल ७५० कंत्राटी कर्मचारी घेतले होते. या कर्मचाऱ्यांची सेवा दि. ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. बुधवारी रात्री उशिरा मनपा प्रशासक यांनी ६१४ कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एवढे कंत्राटी कर्मचारी नेमले तरीही कमीच पडत होते. कारण रुग्णसंख्याच खूप वाढली होती. शहरात तब्बल २३ सीसीसी सेंटरवर रुग्णांवर उपचार सुरू होते. गंभीर रुग्णांना खासगी, घाटी रुग्णालयातही दाखल करावे लागत होते. कोरोनाच्या मागील दोन लाटांचा अनुभव लक्षात घेता ७५० पैकी किमान ५० टक्के कर्मचारी तूर्त कमी करावेत, असा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत प्रशासकांना सादर करण्यात आला होता. रात्री उशिरा ६१४ कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी फक्त १३६ कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ८ एमबीबीएस, ५ आयुष, १ हॉस्पिटल मॅनेजर, ५० नर्सिंग स्टाफ, २ एक्सरे टेक्निशियन, २ ईसीजी टेक्निशियन, ७ डाटा एन्ट्री ऑपरेटर, १० वॉर्ड बॉय, १० महिला वॉर्ड सेविका, आदींचा समावेश आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत शहरात तिसऱ्या लाटेचे आगमन होईल, असा कयास आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना परत कंत्राटी पद्धतीवरच घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने कोरोनातील सर्व कंत्राटी कर्मचारी कमी करावेत, असे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.