शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

मनपातील ६१४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘नारळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:09 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिका प्रशासनाने तब्बल ७५० कंत्राटी कर्मचारी घेतले होते. या कर्मचाऱ्यांची सेवा दि. ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिका प्रशासनाने तब्बल ७५० कंत्राटी कर्मचारी घेतले होते. या कर्मचाऱ्यांची सेवा दि. ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. बुधवारी रात्री उशिरा मनपा प्रशासक यांनी ६१४ कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एवढे कंत्राटी कर्मचारी नेमले तरीही कमीच पडत होते. कारण रुग्णसंख्याच खूप वाढली होती. शहरात तब्बल २३ सीसीसी सेंटरवर रुग्णांवर उपचार सुरू होते. गंभीर रुग्णांना खासगी, घाटी रुग्णालयातही दाखल करावे लागत होते. कोरोनाच्या मागील दोन लाटांचा अनुभव लक्षात घेता ७५० पैकी किमान ५० टक्के कर्मचारी तूर्त कमी करावेत, असा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत प्रशासकांना सादर करण्यात आला होता. रात्री उशिरा ६१४ कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी फक्त १३६ कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ८ एमबीबीएस, ५ आयुष, १ हॉस्पिटल मॅनेजर, ५० नर्सिंग स्टाफ, २ एक्सरे टेक्निशियन, २ ईसीजी टेक्निशियन, ७ डाटा एन्ट्री ऑपरेटर, १० वॉर्ड बॉय, १० महिला वॉर्ड सेविका, आदींचा समावेश आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत शहरात तिसऱ्या लाटेचे आगमन होईल, असा कयास आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना परत कंत्राटी पद्धतीवरच घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने कोरोनातील सर्व कंत्राटी कर्मचारी कमी करावेत, असे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.