शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्था; साफसफाईला वेग

By admin | Updated: August 11, 2015 00:53 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद महाराष्ट्रात २ लाख ३० हजार २९५ सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. परंतु या संस्थांनी आॅनलाईन माहिती भरून देण्याच्या सरकारच्या आवाहनाला

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादमहाराष्ट्रात २ लाख ३० हजार २९५ सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. परंतु या संस्थांनी आॅनलाईन माहिती भरून देण्याच्या सरकारच्या आवाहनाला ठेंगा दाखविल्यामुळे राज्यभरातील सहकारी संस्थांची सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात बंद व निष्क्रिय आढळून आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील किमान ५०० सहकारी संस्था येत्या महिनाभरात अवसायनात निघण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रत्येक सहकारी संस्थेने विभागाच्या संगणक स्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सहकार विभागाने गेल्या वर्षी मोहीम उघडली होती. परंतु त्याला अल्प प्रतिसाद लाभला. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षी ६ हजार ४६३ सहकारी संस्था नोंदणीकृत होत्या. त्यातील जेमतेम ३०० संस्थांनी अशी संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर विभागाने घेतलेल्या मोहिमेत मार्च २०१५ पर्यंत नऊशेहून अधिक संस्था अवसायनात काढण्यात आल्या. औरंगाबाद तालुक्यातील ३३१५ संस्थांपैकी १७० संस्था अवसायनात काढण्यात आल्याचे तालुका उपनिबंधक जे. बी. गुट्टे यांनी सांगितले. दरम्यान, संस्थांनी माहितीच न दिल्यामुळे राज्यातील सर्वच संस्थांची पाहणी करून निष्क्रिय संस्था बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली जिल्ह्यात जोरदारपणे सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. औरंगाबाद तालुक्यात या कामासाठी ४७ अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. ४० दिवसांत या अधिकाऱ्यांनी ८८३ संस्थांची पाहणी पूर्ण केली आहे. त्यातील जवळजवळ १०० हून अधिक संस्था बंद होऊ शकतात, असे दिसते. जिल्ह्याचा विचार करता ही संख्या ५०० पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. १ जुलैपासून सर्वेक्षणास सुरुवात झाली असून, दि.३० सप्टेंबर २०१५ पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले. आहेत. पूर्णत: बंद, काम थांबविलेल्या व पुन्हा कार्यरत होण्याजोग्या नसलेल्या संस्था या सर्वेक्षणाच्या कालावधीतच अवसायनात काढण्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.सर्वेक्षण मोहिमेचा अंतिम अहवाल १० जानेवारी २०१६ पर्यंत सहकार आयुक्तांना देण्याचे सक्त आदेश विभागाला देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतुदीनुसार पुढील संस्था बंद होणार.४नोंदणी नंतर काम सुरू न केलेल्या संस्था (कागदोपत्री तयार झालेल्या संस्था)४काम थांबविलेल्या संस्था (वादग्रस्त संस्था)४पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीचे भाग किंवा सदस्यांच्या अनामत रकमा ताब्यात असलेल्या संस्था.४या कायद्यातील कोणत्याही शर्तीचे अनुपालन न करणाऱ्या संस्था.४सर्वेक्षणाचा कालावधी तीन महिनेसहकार क्षेत्रात विविध ५२ प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करता येतात. संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेचे संचालक मंडळ, वार्षिक लेखाजोखा याचे हिशेब सहकार कार्यालयात सादर करणे आवश्यक असते. परंतु अनेदा संस्थेची नोंदणी करून आर्थिक लाभ उठविला जातो. अनेक संस्था फक्त कागदोपत्रीच असल्याचे दिसते आहे. त्यामुळे राज्यात सहकारी संस्थांची संख्या फुगली. परंतु गुणवत्तापूर्ण काम होऊ शकले नाही. फुगलेल्या संख्येमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण वाढतो. शिवाय योग्य काम करणाऱ्या संस्थांना शासकीय लाभही व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनीही सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.