शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सहकारी संस्थाच्या निवडणुकीचा बिगूल

By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा आखाडा शांत होतो न होतो तोच संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्हाभरात ८७९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा आखाडा शांत होतो न होतो तोच संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्हाभरात ८७९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. डिसेंबरपूर्वी या सर्व संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत आयोगाने कळविले आहे. त्यानुसार प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तेरणासोबतच अन्य सहा कारखान्याची निवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था संचालक मंडळाची मुदत संपूनही विविध कारणांमुळे निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. जवळपास २०१०-११ पासून निवडणूका झाल्याच नाहीत. तब्बल पाच वर्षानंतर अशा संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये ८७९ संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत. या संस्थांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत निवडणूक घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी घेणे अनिवार्य आहे. सदरील निवडी तीन टप्प्यात होणार आहेत. यामध्ये ‘अ’ वर्गातील ६ कारखान्यांचा समावेश आहे. यात बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा, भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना समुद्राळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना केशेगाव, तेरणा साखर कारखाना ढोकी, विठ्ठलसाई साखर कारखाना मुरुम आणि शिवशक्ती साखर कारखाना वाशी यांचा समावेश आहे. त्यानंतर गट ‘ब’ मधील तीन नागरी बँका, सहा नागरी पतसंस्था, ५० विविध कार्यकारी सोसायट्या आणि ७ खरेदीविक्री संघाचा समावेश आहे. ‘क’ वर्गामध्ये ८७ नागरी पतसंस्था (एक कोटीपेक्षा कमी ठेवी असलेल्या), ९३ विविध कार्यकारी सोसायट्या (१० लाखापेक्षा कमी भागभांडवल असलेल्या), १ पाणीपुरवठा संस्था आणि इतर १२६ संस्थांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)सहकारी संस्थांचे संचालक मंडळ हे जास्तीत जास्त २१ सदस्यांचे असणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती/जमाती, इतरमागासप्रवर्ग आणि भटक्या जाती/जमाती प्रत्येकी एक, दोन महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील सहा ते सोळा सभासदांचे मिळून संचालक मंडळ असणार आहे. ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी सहकार खात्यासोबतच अन्य विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, वकील, प्रमाणित लेखा परिक्षक, सहकारी बँकाचे अधिकारी यांचे पॅनल निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणार आहे. या वर्गामध्ये २३८ संस्था असून, या संस्थांचा निवडणूक कृती कार्यक्रम तयार करुन तो निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळताच प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.