शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 22:59 IST

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

हिंगोली : शहरातील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे १५ ते १७ फेबु्रवारीदरम्यान घेतलेल्या जिल्हा ग्रंथोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी प्रमाणपत्र वितरण, व्याख्यान, तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले.अशोक अर्धापूरकर, प्रमुख वक्ते उत्तम सूर्यवंशी, प्रमोद पाटील, खंडेराव सरनाईक, विजय हवालदार, प्रा. जी. पी. मुपकलवार, सुभाष साबळे, जया करडेकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रथम उत्तम सूर्यवंशी यांनी वाचन संस्कृतीवर व्याख्यान दिले. ते म्हणाले, ग्रंथाशिवाय मन तयार होत नाही; त्यामुळे वाचनसंस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले, माणसाच्या जीवनामध्ये विचार करणे हेच जिवंतपणाचे लक्षण असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि.रा. शिंदे व यशवंतराव चव्हाण आदींची उदाहरणे देत स्पष्ट करून दाखविले. तसेच विद्यार्थ्यांनी कथा-कथन व काव्यवाचन केले. यावेळी अंजली जावळे हिने मुलींनी जगावे तरी कसे? ही कविता सादर केली. तर कोमल बांगर हिने आई आपल्या मुलाला गरिबीमध्ये जगणे कशाप्रकारे शिकवते याविषयी काव्यकथन केले. तसेच प्रदीप बनसोडे, अदित्य जाधव, मोहन पांचाळ, आदित्य राखुंडे, प्रदीप बनसोडे यांच्यासह सहभागी विद्यार्थ्यांनी विविध काव्यवाचन व कथाकथन करून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अर्धापूरकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ग्रंथाशिवाय माणूस घडणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ग्रंथ आणि ग्रंथालय कपाट असणे आवश्यक आहे. सयाजीराव गायकवाड यांनी गाव तेथे गं्रथालये ही संकल्पना मांडली होती. परंतु सध्या असे चित्र दिसून येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रा.विलास वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. ग्रंथालय संघातर्फे यासाठी परिश्रम घेण्यात आले. (प्रतिनिधी)