शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

जलकुंभावर चढले, दोन पुतळे जाळले, अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद: प्रहार जनशक्ती पक्षाचे बॅनर हातात घेऊन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरूध्द घोषणा देत २५ ते ३० कार्यकर्ते ...

औरंगाबाद: प्रहार जनशक्ती पक्षाचे बॅनर हातात घेऊन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरूध्द घोषणा देत २५ ते ३० कार्यकर्ते गुरूवारी दुपारी अचानक शिवाजीनगर जलकुंभावर चढले. पोलीस आणि जनतेचे लक्ष वेधून घेत त्यांनी एकापाठोपाठ दोन पुतळे जाळले. एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. अन्य कार्यकर्त्यांनीच त्याला आवरले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच ठेवले.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले. पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार विनंती करूनही ते जलकुंभावरुन उतरले नाही. आंदोलकांपैकी काही जण कपडे काढून घोषणा देत होते, तर काही तेथे पडलेले कुलरचे प्लास्टीक खोके आणि लाकडी बॉक्स अधूनमधून जाळून लक्ष वेधून घेत होते. या आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड, यांच्यासह सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चौकट

काय आहेत मागण्या

- शेतकरी विरोधी काळे कायदे तत्काळ रद्द करा.

-दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी.