शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

स्वच्छता विशेषांक धूळ खात; सर्व शिक्षा अभियानात नियोजनाचाच ‘कचरा’

By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST

बीड : दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वच्छतेचा डंका पिटत असताना येथील सर्व शिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काही देणे-घेणे राहीले नाही की काय?

बीड : दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वच्छतेचा डंका पिटत असताना येथील सर्व शिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काही देणे-घेणे राहीले नाही की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण डिसेंबर २०१४ मध्ये शाळांसाठी स्वच्छता विशेषांक आले होते, ते फेब्रु्रवारी उजाडला तरी जिल्हा कार्यालयातच धूळ खात पडून आहेत. सफाई तर दूरच; पण विशेषांकालाच अडगळीत टाकून अधिकाऱ्यांनी नियोजनाचा ‘कचरा’ केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पुढे आला.पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ‘जीवन शिक्षण’ हे मासिक प्रकाशित केले जाते. तब्बल ५९ वर्षांची परंपरा असलेले हे मासिक राज्यातील बहुतांश जि.प. शाळांमध्ये जाते. शिक्षण क्षेत्राशी निगडीत मजकूर या विशेषांकातून दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहीम गतिमान केली. २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१४ या दरम्यान ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ ही विशेष मोहीम घेण्यात आली होती. त्यानुषंगाने डिसेंबर महिन्यात जीवन शिक्षणने स्वच्छता विशेषांक काढला होता. शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांच्यासह इतर वरिष्ठ व तज्ज्ञांचे त्यात लेख व समर्पक छायाचित्रे आहेत. २ हजार ४४७ शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत व ३ हजार २७८ शाळांमधील स्वच्छतागृहे वापरात नाहीत. स्वच्छतागृहांची उपयोगिता व महत्त्व वाढावे, असा उद्देश या मासिकाचा उद्देश होता. शिवाय विद्यार्थ्यांत स्वच्छतेचे महत्त्व वाढावे हा देखील हेतू होता.मासिकांच्या दोन हजारांवर प्रती बीडच्या सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयात डिसेंबर महिन्यात दाखल झाल्या. त्यापैकी निम्म्याच प्रती शाळांमध्ये पोहोचल्या. उर्वरित विशेषांक कार्यालयातच अडगळीला पडलेले आहेत. त्यावर धूळ साचली असून किती पोहोच झाले? किती राहिले? याचा हिशेबही कार्यालयात नाही. विशेषांकावरच धूळ साचल्याने स्वच्छतेची किती ‘काळजी’ आहे? हे देखील यानिमित्ताने समोर आले आहे. (प्रतिनिधी)सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, स्वच्छता विशेषांक शाळांपर्यंत पोहोचवले आहेत. काही राहिले असतील तर ते का वाटप झाले नाही? याची चौकशी करावी लागेल.