शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

खाम पात्राची ‘सफाई’ सुरू

By admin | Updated: May 12, 2016 01:02 IST

औरंगाबाद : खाम नदीच्या पात्रात १०० फुटांच्या आत येणाऱ्या अतिक्रमणांवर बुधवारी कारवाई करण्यास सुरुवात झाली

औरंगाबाद : खाम नदीच्या पात्रात १०० फुटांच्या आत येणाऱ्या अतिक्रमणांवर बुधवारी कारवाई करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने तब्बल ५५ लहान-मोठी घरे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे नदीपात्रात एकच हाहाकार उडाला आहे. नदीच्या पात्रात प्लॉटिंग करून गोरगरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांवरही मनपाने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील जमिनींचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. औरंगाबाद शहरात आपलेही एक हक्काचे घर असावे, असे प्रत्येक गरीब नागरिकाचे स्वप्न असते. मागील २० वर्षांमध्ये भूमाफियांनी खाम नदीचे पात्र गिळण्याचे काम केले आहे. गरीब नागरिकांना ५० ते ६० हजार रुपयांमध्ये भूमाफियांनी प्लॉट विकले आहेत. बाँड पेपरवर झालेला हा व्यवहार कायदेशीर नसला तरी गरिबांसाठी तोच कागद मोठा ‘आधार’असतो. नदीच्या पात्रात पाच हजारांहून अधिक नागरिकांनी माती आणि विटांनी आपला ‘आशियाना’बांधला. यामध्ये पक्की घरेही बरीच आहेत. नदी पात्रात ३०० ते ४०० मीटरपर्यंत दाट लोकवस्ती झाली आहे. मागील दहा वर्षांपासून पावसाळ्यात खाम नदीच्या पात्राचा विषय गाजत असतो.