शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रस्ते काँक्रिटीकरणाने स्वच्छतेचा बोजवारा!

By admin | Updated: May 16, 2017 00:44 IST

जालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत. परिणामी त्या त्या परिसरातील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. शहरात दररोज सुमारे ८० टन कचरा निघतो. पैकी केवळ ५० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जालना शहरात डांबरी रस्त्यांच्या जागी सिमेंटचे रस्ते होत आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले. कामे सुरू होण्यापूर्वी कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी व कचराकुंड्या उचलण्यासाठी हायड्रोलिक वाहने आठ ते पंधरा दिवसांआड तरी येत असे. परंतु रस्ते खोदकामामुळे गत अडीच ते तीन महिन्यांपासून कचरा संकलनावर याचा परिणाम दिसून येत आहे. साचलेला कचरा पुन्हा नाल्यांमध्ये टाकला जात आहे. विशेषत: कचेरी रोड, सिंधी बाजार, सराफा, गांधी चमन परिसर, शिवाजी पुतळा, मंगळबाजार वेस, टाऊन हॉल आदी भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्ते बंद असल्याने घंटागाड्या अथवा कचरा संकलन करणारी अन्य वाहने अंतर्गत भागात येत नाही. कचरा टाकावा तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागात उकिरडे असल्याने तेथे कचरा टाकून नागरिक मोकळे होतात. काही भागात कचराकुंड्याही नाहीत आणि उकिरडेही नाहीत. त्यामुळे ती कुटुंबे त्रस्त आहत. रस्ते कामे सुरू असल्याने घंटागाडी येऊ शकत नाही, अशी जुजबी उत्तरे स्वच्छता विभागातून मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या, शहरातील स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. काही भागांत रस्त्याची कामे सुरू असल्याने स्वच्छतेवर परिणाम होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर पालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरात स्वच्छता अभियान राबवून उर्वरित रस्त्यांची कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील.