शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

रस्ते काँक्रिटीकरणाने स्वच्छतेचा बोजवारा!

By admin | Updated: May 16, 2017 00:44 IST

जालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत. परिणामी त्या त्या परिसरातील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. शहरात दररोज सुमारे ८० टन कचरा निघतो. पैकी केवळ ५० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जालना शहरात डांबरी रस्त्यांच्या जागी सिमेंटचे रस्ते होत आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले. कामे सुरू होण्यापूर्वी कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी व कचराकुंड्या उचलण्यासाठी हायड्रोलिक वाहने आठ ते पंधरा दिवसांआड तरी येत असे. परंतु रस्ते खोदकामामुळे गत अडीच ते तीन महिन्यांपासून कचरा संकलनावर याचा परिणाम दिसून येत आहे. साचलेला कचरा पुन्हा नाल्यांमध्ये टाकला जात आहे. विशेषत: कचेरी रोड, सिंधी बाजार, सराफा, गांधी चमन परिसर, शिवाजी पुतळा, मंगळबाजार वेस, टाऊन हॉल आदी भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्ते बंद असल्याने घंटागाड्या अथवा कचरा संकलन करणारी अन्य वाहने अंतर्गत भागात येत नाही. कचरा टाकावा तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागात उकिरडे असल्याने तेथे कचरा टाकून नागरिक मोकळे होतात. काही भागात कचराकुंड्याही नाहीत आणि उकिरडेही नाहीत. त्यामुळे ती कुटुंबे त्रस्त आहत. रस्ते कामे सुरू असल्याने घंटागाडी येऊ शकत नाही, अशी जुजबी उत्तरे स्वच्छता विभागातून मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या, शहरातील स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. काही भागांत रस्त्याची कामे सुरू असल्याने स्वच्छतेवर परिणाम होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर पालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरात स्वच्छता अभियान राबवून उर्वरित रस्त्यांची कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील.