शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

स्वच्छता अभियानाला ‘खो’

By admin | Updated: February 17, 2015 00:42 IST

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली; प

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली; परंतु एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागात अभियानाला पहिल्याच दिवशी ‘खो’ देण्यात आल्याचे चित्र ‘लोकमत’ने सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात केलेल्या पाहणीतून समोर आले. कचऱ्याने भरलेल्या, तंबाखू, पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याने लाल झालेले कोपरे अशा प्रकारे अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त अनेक बसगाड्या प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या.राज्यातील सर्व बस आगार आणि बसस्थानकांची पूर्णपणे स्वच्छता होण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याची घोषणा करण्यातआली. या अभियानांतर्गत सर्व बसस्थानके, आगार यांची रंगरंगोटी करणे, प्रसाधनगृहे आणि परिसराची स्वच्छता करणे, योग्य ठिकाणी कचराकुंड्या ठेवणे, झाडांच्या कुंड्या ठेवणे, आगारातून निघणारी प्रत्येक बसगाडी स्वच्छ झाडून व धुऊन पाठविणे अशा प्रकारच्या विविध सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या; परंतु अभियानाच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद विभागाने त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. बसस्थानकात दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारे स्वच्छता करण्यात आली नव्हती.कुठे कागदांचे ढीग पडलेले, कुठे कचरा साचलेला असे दिसले. शिवाय रवाना होणाऱ्या अनेक बसगाड्यांची स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यामुळे एक प्रकारे परिवहनमंत्र्यांच्या सूचनेलाच अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. स्वच्छता अभियानच्या अंमलबजावणीबाबत विभाग कोसो दूर असल्याचे दिसूनआले.कचरा पेट्या बंद खोलीतमध्यवर्ती बसस्थानकास काही दिवसांपूर्वी एका संस्थेकडून कचरा पेट्या देण्यात आल्या होत्या. यातील काही कचरा पेट्यांचा वापर सुरू केला आहे, तर काही कचऱ्या पेट्या बंद खोलीत पडून आहेत.