शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

स्वच्छता अभियानाला ‘खो’

By admin | Updated: February 17, 2015 00:42 IST

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली; प

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली; परंतु एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागात अभियानाला पहिल्याच दिवशी ‘खो’ देण्यात आल्याचे चित्र ‘लोकमत’ने सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात केलेल्या पाहणीतून समोर आले. कचऱ्याने भरलेल्या, तंबाखू, पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याने लाल झालेले कोपरे अशा प्रकारे अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त अनेक बसगाड्या प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या.राज्यातील सर्व बस आगार आणि बसस्थानकांची पूर्णपणे स्वच्छता होण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याची घोषणा करण्यातआली. या अभियानांतर्गत सर्व बसस्थानके, आगार यांची रंगरंगोटी करणे, प्रसाधनगृहे आणि परिसराची स्वच्छता करणे, योग्य ठिकाणी कचराकुंड्या ठेवणे, झाडांच्या कुंड्या ठेवणे, आगारातून निघणारी प्रत्येक बसगाडी स्वच्छ झाडून व धुऊन पाठविणे अशा प्रकारच्या विविध सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या; परंतु अभियानाच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद विभागाने त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. बसस्थानकात दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारे स्वच्छता करण्यात आली नव्हती.कुठे कागदांचे ढीग पडलेले, कुठे कचरा साचलेला असे दिसले. शिवाय रवाना होणाऱ्या अनेक बसगाड्यांची स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यामुळे एक प्रकारे परिवहनमंत्र्यांच्या सूचनेलाच अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. स्वच्छता अभियानच्या अंमलबजावणीबाबत विभाग कोसो दूर असल्याचे दिसूनआले.कचरा पेट्या बंद खोलीतमध्यवर्ती बसस्थानकास काही दिवसांपूर्वी एका संस्थेकडून कचरा पेट्या देण्यात आल्या होत्या. यातील काही कचरा पेट्यांचा वापर सुरू केला आहे, तर काही कचऱ्या पेट्या बंद खोलीत पडून आहेत.