शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

‘स्वच्छ महाराष्ट्र’चे काम अर्ध्यावरच!

By admin | Updated: May 27, 2017 00:42 IST

जालना : आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरी व ग्रामीण भाग संपूर्ण पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.नागरी क्षेत्रातील जालना, परतूर, अंबड, भोकदरन नगरपरिषदा व घनसावंगी, मंठा, जाफराबाद व बदनापूर नगरपंचायत क्षेत्रात २०१५ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार २४ हजार ७३४ कुटुंब उघड्यावर शौचास जातात. ही संख्या लक्षात घेता मार्च २०१७ अखेर २४ हजार ३७६ स्वच्छतागृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. याकरिता सर्वच नगरपरिषदांनी मोठी यंत्रणा कामाला लावली. जनजागृती मोहिमेसह उघड्यावर जाणाऱ्यांवर गुड मॉर्निंग पथकांमार्फत गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतु स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट अपूर्णच आहे. वरील आठ शहरांमध्ये २६ मे २०१७ अखेर अकरा हजार ३६७ कुटुंबांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर दहा हजार ९८८ स्वच्छतागृहांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. स्वच्छतागृहांच्या बांधकामात अंबड, परतूर, भोकरदन या नगरपरिषदांचे काम समाधानकारक असले तरी जालना, घनसावंगी, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर शहरांमधील बहुतांश कामे अपूर्ण आहेत.स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी २१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर असला, तरी आतापर्यंत २२ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांचा वापर हा सक्तीचा नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने नियमित सवयीचा भाग बनावा, हे जोपर्यंत प्रत्येकाला पटत नाही. तोपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण पाणंदमुक्ती अशक्य आहे. दरम्यान, नगर विकास विभागाचे सचिव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे जालना जिल्ह्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान कामाचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.