शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

‘स्वच्छ महाराष्ट्र’चे काम अर्ध्यावरच!

By admin | Updated: May 27, 2017 00:42 IST

जालना : आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरी व ग्रामीण भाग संपूर्ण पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.नागरी क्षेत्रातील जालना, परतूर, अंबड, भोकदरन नगरपरिषदा व घनसावंगी, मंठा, जाफराबाद व बदनापूर नगरपंचायत क्षेत्रात २०१५ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार २४ हजार ७३४ कुटुंब उघड्यावर शौचास जातात. ही संख्या लक्षात घेता मार्च २०१७ अखेर २४ हजार ३७६ स्वच्छतागृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. याकरिता सर्वच नगरपरिषदांनी मोठी यंत्रणा कामाला लावली. जनजागृती मोहिमेसह उघड्यावर जाणाऱ्यांवर गुड मॉर्निंग पथकांमार्फत गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतु स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट अपूर्णच आहे. वरील आठ शहरांमध्ये २६ मे २०१७ अखेर अकरा हजार ३६७ कुटुंबांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर दहा हजार ९८८ स्वच्छतागृहांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. स्वच्छतागृहांच्या बांधकामात अंबड, परतूर, भोकरदन या नगरपरिषदांचे काम समाधानकारक असले तरी जालना, घनसावंगी, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर शहरांमधील बहुतांश कामे अपूर्ण आहेत.स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी २१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर असला, तरी आतापर्यंत २२ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांचा वापर हा सक्तीचा नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने नियमित सवयीचा भाग बनावा, हे जोपर्यंत प्रत्येकाला पटत नाही. तोपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण पाणंदमुक्ती अशक्य आहे. दरम्यान, नगर विकास विभागाचे सचिव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे जालना जिल्ह्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान कामाचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.