शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

‘स्वच्छ महाराष्ट्र’चे काम अर्ध्यावरच!

By admin | Updated: May 27, 2017 00:42 IST

जालना : आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरी व ग्रामीण भाग संपूर्ण पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.नागरी क्षेत्रातील जालना, परतूर, अंबड, भोकदरन नगरपरिषदा व घनसावंगी, मंठा, जाफराबाद व बदनापूर नगरपंचायत क्षेत्रात २०१५ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार २४ हजार ७३४ कुटुंब उघड्यावर शौचास जातात. ही संख्या लक्षात घेता मार्च २०१७ अखेर २४ हजार ३७६ स्वच्छतागृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. याकरिता सर्वच नगरपरिषदांनी मोठी यंत्रणा कामाला लावली. जनजागृती मोहिमेसह उघड्यावर जाणाऱ्यांवर गुड मॉर्निंग पथकांमार्फत गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतु स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट अपूर्णच आहे. वरील आठ शहरांमध्ये २६ मे २०१७ अखेर अकरा हजार ३६७ कुटुंबांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर दहा हजार ९८८ स्वच्छतागृहांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. स्वच्छतागृहांच्या बांधकामात अंबड, परतूर, भोकरदन या नगरपरिषदांचे काम समाधानकारक असले तरी जालना, घनसावंगी, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर शहरांमधील बहुतांश कामे अपूर्ण आहेत.स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी २१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर असला, तरी आतापर्यंत २२ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांचा वापर हा सक्तीचा नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने नियमित सवयीचा भाग बनावा, हे जोपर्यंत प्रत्येकाला पटत नाही. तोपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण पाणंदमुक्ती अशक्य आहे. दरम्यान, नगर विकास विभागाचे सचिव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे जालना जिल्ह्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान कामाचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.