शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’च्या पुढाऱ्यांनाच ‘स्वच्छ भारत’चे वावडे !

By admin | Updated: July 28, 2016 00:51 IST

उस्मानाबाद : वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण वाढून गावे, हागणदारीमुक्त व्हावीत, यासाठी शासन स्वच्छ भारत अभियानाअंतर्ग दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत.

उस्मानाबाद : वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण वाढून गावे, हागणदारीमुक्त व्हावीत, यासाठी शासन स्वच्छ भारत अभियानाअंतर्ग दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. परंतु, स्वत:ला जनतेचे कैवारी म्हणवून घेणारे जिल्हा परिषदेतील पुढारीच या अभियानाकडे पाठ फिरविताना दिसून येत आहेत. चार वर्षांचा कालावधी लोटूनही ५४ पैकी तब्बल ५३ सदस्यांना स्वत:चा मतदार संघ म्हणजेच जि.प. गट असणारी गावेही हागणदारीमुक्त करता आलेली नाहीत. त्यामुळे पुढाऱ्यांना या अभियानाबाबत किती कळवळा आहे? हेच यातून समोर आले आहे.केंद्र तसेच राज्य शासनानेही स्वच्छ भारत महत्व दिले आहे. सदरील अभियान अधिकाअधिक गतीमान व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण वाढावे, यासाठी या कक्षाकडून प्रयत्न केले जातात. गावस्तरावर बैठक घेणे, जनजागृती करणे आदी जबाबदाऱ्या या कक्षाकडून पार पाडल्या जातात. यामुळे निश्चितच, पूर्वीच्या तुनेत अभियान अगितीमान झाले आहे. परंतु, दुसरीकडे जिल्हा परिषद पुढारीच याबाबतीत प्रचंड उदासीन असल्याचे धक्कादायक वास्त समोर आले आहे. अभियानाअंतर्गत गावोगावी कार्यक्रम घेण्यात येतात. अशावेळी व्यासपीठावरून घसा कोरडापडेपर्यंत ओरडणाऱ्या याच जिल्हा परिषद पुढाऱ्यांचे मतदार संघ म्हणजेच जि.प. गट असणारी गावे हागणदारीमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा सदस्यांबाबत ग्रामस्थांना ‘दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान...’ या म्हणीचा प्रत्येय येत आहे. जिल्हा परिषद सदस्यांना गावे दत्तकजिल्हा परिषदेकडून स्मार्ट व्हिलेज हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. परंतु, बोटावर मोजण्याइतपतच सदस्यांनी नावे सूचवून उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. यानंतर सदर योजनेचे काय झाले? हे खुद्ध अधिकाऱ्यांनाही माहीत नाही. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद सदस्यांचा सहभाग नसल्याचे समोर आल्यानंतर आता अशा सदस्यांना गाव दत्तक देण्यात येणार आहे. त्यानुसार काही सदस्यांनी गावांची नावेही सूचविली आहेत. त्यामुळे किती सदस्यांची गावे हागणदारीमुक्त होतात? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.