शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

‘झेडपी’च्या पुढाऱ्यांनाच ‘स्वच्छ भारत’चे वावडे !

By admin | Updated: July 28, 2016 00:51 IST

उस्मानाबाद : वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण वाढून गावे, हागणदारीमुक्त व्हावीत, यासाठी शासन स्वच्छ भारत अभियानाअंतर्ग दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत.

उस्मानाबाद : वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण वाढून गावे, हागणदारीमुक्त व्हावीत, यासाठी शासन स्वच्छ भारत अभियानाअंतर्ग दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. परंतु, स्वत:ला जनतेचे कैवारी म्हणवून घेणारे जिल्हा परिषदेतील पुढारीच या अभियानाकडे पाठ फिरविताना दिसून येत आहेत. चार वर्षांचा कालावधी लोटूनही ५४ पैकी तब्बल ५३ सदस्यांना स्वत:चा मतदार संघ म्हणजेच जि.प. गट असणारी गावेही हागणदारीमुक्त करता आलेली नाहीत. त्यामुळे पुढाऱ्यांना या अभियानाबाबत किती कळवळा आहे? हेच यातून समोर आले आहे.केंद्र तसेच राज्य शासनानेही स्वच्छ भारत महत्व दिले आहे. सदरील अभियान अधिकाअधिक गतीमान व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण वाढावे, यासाठी या कक्षाकडून प्रयत्न केले जातात. गावस्तरावर बैठक घेणे, जनजागृती करणे आदी जबाबदाऱ्या या कक्षाकडून पार पाडल्या जातात. यामुळे निश्चितच, पूर्वीच्या तुनेत अभियान अगितीमान झाले आहे. परंतु, दुसरीकडे जिल्हा परिषद पुढारीच याबाबतीत प्रचंड उदासीन असल्याचे धक्कादायक वास्त समोर आले आहे. अभियानाअंतर्गत गावोगावी कार्यक्रम घेण्यात येतात. अशावेळी व्यासपीठावरून घसा कोरडापडेपर्यंत ओरडणाऱ्या याच जिल्हा परिषद पुढाऱ्यांचे मतदार संघ म्हणजेच जि.प. गट असणारी गावे हागणदारीमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा सदस्यांबाबत ग्रामस्थांना ‘दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान...’ या म्हणीचा प्रत्येय येत आहे. जिल्हा परिषद सदस्यांना गावे दत्तकजिल्हा परिषदेकडून स्मार्ट व्हिलेज हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. परंतु, बोटावर मोजण्याइतपतच सदस्यांनी नावे सूचवून उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. यानंतर सदर योजनेचे काय झाले? हे खुद्ध अधिकाऱ्यांनाही माहीत नाही. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद सदस्यांचा सहभाग नसल्याचे समोर आल्यानंतर आता अशा सदस्यांना गाव दत्तक देण्यात येणार आहे. त्यानुसार काही सदस्यांनी गावांची नावेही सूचविली आहेत. त्यामुळे किती सदस्यांची गावे हागणदारीमुक्त होतात? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.