शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ची वाटचाल बिकटच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:36 IST

उस्मानाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने सर्वाधिक जोर दिलेल्या स्वच्छ भारत अभियानाची जिल्ह्यातील वाटचाल बिकट असल्याचे चित्र आहे़

विशाल सोनटक्के। लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने सर्वाधिक जोर दिलेल्या स्वच्छ भारत अभियानाची जिल्ह्यातील वाटचाल बिकट असल्याचे चित्र आहे़ तालुके पाणंदमुक्त करण्याच्या तारखा जवळ आल्या असतानाही जिल्ह्याला यात केवळ ५३ टक्के यश मिळालेले आहे़ विशेष म्हणजे, कळंब आणि परंडा तालुक्यातील परिस्थिती आणखीनच चिंतानजक असल्याचे दिसून येते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी देशभरात स्वच्छता अभियानाला सुरूवात केली़ केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनानेही ही महत्त्वकांक्षी योजना तडीस नेऊन स्वच्छ भारत साकारण्याचे स्वप्न पाहिले आहे़ त्या दृष्टीने प्रशासन कामालाही लागले आहे़ मात्र, त्यानंतरही नागरिकांच्या पुढाकाराअभावी जिल्ह्यात या अभियानाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचे प्रशासनाने दिलेली आकडेवारी सांगते़ जिल्ह्यात २ लाख ५४ हजार ७६० कुटुंबे आहेत़ ३१ मार्च २०१७ अखेर यातील एक लाख १९ हजार २४ कुटुंबाकडे शौचालये आहेत़ २०१७-१८ या वर्षामध्ये एक लाख ३५ हजार ६८३ कुुटुंबाकडे शौचालय उभारण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे़ सद्यस्थितीत भूम तालुक्यात ६०१, कळंब- १४६७, उमरगा- ८६, उस्मानाबाद- ३११८, परंडा- २२५, तुळजापूर- ११४४ तर वाशी तालुक्यात ५१० शौचालयांची उभारणी सुरू असून, ११ मे अखेर भूम तालुक्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५५़१४ टक्के एवढे काम पूर्ण केले आहे़ कळंब तालुक्यात ४०़१८ टक्के, उमरगा- ४९़५२ टक्के, उस्मानाबाद ५१़३३ टक्के, तुळजापूर- ४७़८४ टक्के तर वाशी तालुक्यात ७१़०२ टक्के एवढे उद्दीष्ठ साध्य करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र, कळंब, परंड्यासह तुळजापूर तालुक्यातील स्वच्छ भारत अभियानाचे काम अद्यापही ५० टक्क्यांच्या आतच असल्याने हे तालुके ठरवून दिलेल्या तारखेत आपले उद्दीष्ठ पूर्ण करणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तुलनेने अत्यंत छोट्या असलेल्या लोहारा तालुक्याने मात्र आपले उद्दीष्ठ पूर्ण केले आहे़