शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

‘स्वच्छ भारत’ची वाटचाल बिकटच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:36 IST

उस्मानाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने सर्वाधिक जोर दिलेल्या स्वच्छ भारत अभियानाची जिल्ह्यातील वाटचाल बिकट असल्याचे चित्र आहे़

विशाल सोनटक्के। लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने सर्वाधिक जोर दिलेल्या स्वच्छ भारत अभियानाची जिल्ह्यातील वाटचाल बिकट असल्याचे चित्र आहे़ तालुके पाणंदमुक्त करण्याच्या तारखा जवळ आल्या असतानाही जिल्ह्याला यात केवळ ५३ टक्के यश मिळालेले आहे़ विशेष म्हणजे, कळंब आणि परंडा तालुक्यातील परिस्थिती आणखीनच चिंतानजक असल्याचे दिसून येते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी देशभरात स्वच्छता अभियानाला सुरूवात केली़ केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनानेही ही महत्त्वकांक्षी योजना तडीस नेऊन स्वच्छ भारत साकारण्याचे स्वप्न पाहिले आहे़ त्या दृष्टीने प्रशासन कामालाही लागले आहे़ मात्र, त्यानंतरही नागरिकांच्या पुढाकाराअभावी जिल्ह्यात या अभियानाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचे प्रशासनाने दिलेली आकडेवारी सांगते़ जिल्ह्यात २ लाख ५४ हजार ७६० कुटुंबे आहेत़ ३१ मार्च २०१७ अखेर यातील एक लाख १९ हजार २४ कुटुंबाकडे शौचालये आहेत़ २०१७-१८ या वर्षामध्ये एक लाख ३५ हजार ६८३ कुुटुंबाकडे शौचालय उभारण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे़ सद्यस्थितीत भूम तालुक्यात ६०१, कळंब- १४६७, उमरगा- ८६, उस्मानाबाद- ३११८, परंडा- २२५, तुळजापूर- ११४४ तर वाशी तालुक्यात ५१० शौचालयांची उभारणी सुरू असून, ११ मे अखेर भूम तालुक्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५५़१४ टक्के एवढे काम पूर्ण केले आहे़ कळंब तालुक्यात ४०़१८ टक्के, उमरगा- ४९़५२ टक्के, उस्मानाबाद ५१़३३ टक्के, तुळजापूर- ४७़८४ टक्के तर वाशी तालुक्यात ७१़०२ टक्के एवढे उद्दीष्ठ साध्य करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र, कळंब, परंड्यासह तुळजापूर तालुक्यातील स्वच्छ भारत अभियानाचे काम अद्यापही ५० टक्क्यांच्या आतच असल्याने हे तालुके ठरवून दिलेल्या तारखेत आपले उद्दीष्ठ पूर्ण करणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तुलनेने अत्यंत छोट्या असलेल्या लोहारा तालुक्याने मात्र आपले उद्दीष्ठ पूर्ण केले आहे़