शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

स्वच्छतेत जालना शहर मागेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:15 IST

जालना: केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरांतील स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जालन्याने ३६८ वा क्रमांक मिळविला.

जालना: केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरांतील स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जालन्याने ३६८ वा क्रमांक मिळविला. थोडक्यात जालना लांब फेकले गेल्याने शहरातील स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्राच्या नगर विकास विभागाने जानेवारीमध्ये स्वच्छ शहर स्पर्धा घेतली होती. यात अंतर्गत शहरातील शौैचालयासह एकूणच स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. नगर पालिका स्वच्छतेच्या कामांत किती अग्रेसर आहे. कचरा निर्मूलन तसेच दैैनंदिन स्वच्छता कशी होते याबाबत विशेष पथक तसेच पालिकेने पाठविलेल्या माहितीच्या आधारावर केंद्राने शहर स्वच्छतेचा निकष ठरविला आहे. केंद्रीय पथकाने जानेवारीत संपूर्ण शहरात फिरून स्वच्छतेची पाहणी केली होती. याचे छायाचित्रणही केले होते. सोबतच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना थेट उकिरडे अथवा हगणदारी ठिकाणचे छायाचित्र आॅनलाईन पाठविण्यास सांगितले होते. विविध पातळ्यांवर अभ्यास करून शहराला ३६८ वा क्रमांक दिला. जालना शहरात दररोज ओला व सुका मिळून सुमारे ८० टन कचरा जमा होतो. पालिकेकडे मनुष्य बळ कमी असल्याने सुमारे ६० ते ६५ टन कचरा दररोज उचलला जातो. पालिकेच्या स्वच्छता विभागात ३५७ कर्मचारी आहेत. संपूर्ण शहर योग्यरित्या स्वच्छ करण्यासाठी सातशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्याने शहर स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. मुख्याधिकारी संतोष खांडेकर म्हणाले, केंद्राच्या नगर विभाग विभागाने ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत जालना शहरास नेमके गुण किती मिळाले याची माहिती नाही. मात्र, ३६८ वा क्रमांक मिळाला आहे. यामुळे जालना शहरातील स्वच्छतेबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. आगामी काळात विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. केंद्राने जे निकष सांगितले होते त्यानुसार अनेक निकष पालिकेने पूर्ण केले असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)