शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

महसूलला डावलल्याने नागरी सेवा पुरस्कार वादात

By admin | Updated: April 23, 2016 01:21 IST

औरंगाबाद : १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त देण्यात आलेल्या पुरस्कारात महसूल विभागाला डावलल्यामुळे ते पुरस्कार वादात अडकले आहेत.

औरंगाबाद : १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त देण्यात आलेल्या पुरस्कारात महसूल विभागाला डावलल्यामुळे ते पुरस्कार वादात अडकले आहेत. पुरस्काराची यादी पाहिली असता यामध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे, अशी तक्रार राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो. ज्यावेळी शासनाचे अतिमहत्त्वाचे विषय मार्गी लावणे अथवा कार्यान्वित करायचे असतात. तेव्हा महसूल विभागावरच ती जबाबदारी दिली जाते. कितीही कामाचा व्याप असला तरी तो विभागच कामे पूर्ण करतो. असे असताना पुरस्कार देताना किंवा वेतनश्रेणी देण्याचा विषय आला की महसूल विभागाचा शासनाला सोयिस्कररीत्या विसर पडतो. महसूल विभागात केवळ जिल्हाधिकारीच काम करतात व इतर पदांवरील अधिकारी, कर्मचारी जसे अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, वाहनचालक, कोतवाल हे कोणीच काम करीत नाहीत, असा शासनाचा समज झाला आहे. दुष्काळात हीच यंत्रणा काम करीत आहे. शासनाला याचा विसर पडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महसूल विभागच खऱ्या अर्थाने नागरी सेवा विभाग आहे; परंतु नागरी सेवा दिनाच्या सत्कारातून या विभागालाच डावलल्याने संघटनेच्या भावना तीव्र झाल्या आहेत, असे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे यांनी १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, तहसीलदार शशिकांत गायकवाड, नायब तहसीलदार बी. डी. म्हस्के, मंडळ अधिकारी सतीश तुपे, अव्वल कारकून सचिन सपकाळे, तलाठी उदय कुलकर्णी, लिपिक आर. के. जरे, लघुलेखक डी. एल. आटुळे, लघुटंकलेखक दीपक आगळे, वाहनचालक गोरख डोंगरे, शिपाई फकीरचंद डोंगरे, कोतवाल राजेंद्र सुरासे यांना नागरी सेवा पुरस्कार प्रदान केला. नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासनाचे विविध विभाग जिल्हास्तरावर जनतेची कामे करण्यासाठी तयार असतात. आधुनिक तंत्रज्ञान आता लोकविकासाचे साधन बनले आहे. कुणावरही टीका-टिप्पणी न करता आपले कर्तव्य चोख बजवावे. लोकांप्रती समर्पण असावे. शिस्तप्रियता असावी, तणावमुक्त काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पांडे यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची यावेळी उपस्थिती होती.