शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

तर शहरातील आठवडा बाजारही होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागताच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनास्थितीवर महापालिकेचे ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागताच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनास्थितीवर महापालिकेचे बारीक लक्ष आहे. आठवडा बाजारसह अन्य विषयांबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व महापालिका आयुक्तांनी आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. पांडेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरातील कोरोनास्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या सोबत समिती स्थापन केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी पुन्हा सुरु करण्याबद्दल देखील हेच धोरण आहे. शासनाने काही प्रोटोकॉल ठरवून दिले आहेत, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. महापालिकेने सध्या मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणीवर भर दिला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे घर सील करण्याची कारवाई सुद्धा करण्यात येईल. जास्त रुग्ण संख्या असलेल्या परिसरात पुन्हा पूर्वीप्रमाणे पत्रे लावून परिसर सील करण्यात येणार आहे.