शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

तर शहरातील आठवडा बाजारही होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागताच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनास्थितीवर महापालिकेचे ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागताच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनास्थितीवर महापालिकेचे बारीक लक्ष आहे. आठवडा बाजारसह अन्य विषयांबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व महापालिका आयुक्तांनी आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. पांडेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरातील कोरोनास्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या सोबत समिती स्थापन केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी पुन्हा सुरु करण्याबद्दल देखील हेच धोरण आहे. शासनाने काही प्रोटोकॉल ठरवून दिले आहेत, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. महापालिकेने सध्या मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणीवर भर दिला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे घर सील करण्याची कारवाई सुद्धा करण्यात येईल. जास्त रुग्ण संख्या असलेल्या परिसरात पुन्हा पूर्वीप्रमाणे पत्रे लावून परिसर सील करण्यात येणार आहे.