शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

शहरातील उद्योगांचा ‘कणा’ मोडतोय!

By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST

औरंगाबाद : गुणवत्ता, चिकाटी आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादेतील उद्योगांनी जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले; मात्र मागील काही वर्षांपासून उद्योजक वेगवेगळ्या करांमुळे त्रस्त झाले आहेत.

औरंगाबाद : गुणवत्ता, चिकाटी आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादेतील उद्योगांनी जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले; मात्र मागील काही वर्षांपासून उद्योजक वेगवेगळ्या करांमुळे त्रस्त झाले आहेत. स्पर्धेच्या युगात उद्योगाकडे बघावे, का कर भरण्यात वेळ वाया घालवावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. करांच्या ओझ्यापासून उद्योजकांची मुक्तता करावी आणि एक खिडकी योजना राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.शहरातील वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रातील लहान-मोठ्या उद्योजकांकडे शासकीय यंत्रणेचा पाहण्याचा दृष्टिकोनही निराळा आहे. उद्योजकांना ‘दान’व समजण्यात येत आहे. एमआयडीसी उद्योजकांकडून सेवाशुल्क घेते, तर ग्रामपंचायत कर आकारणी करते. एवढे करूनही उद्योजकांना सुविधा कोणत्याच मिळत नाहीत. एमआयडीसी वाळूजमध्ये नोंदणीकृत उद्योजक एक हजार असले तरी या उद्योजकांवर उदरनिर्वाह करणारे आणखी एक हजार उद्योजक आहेत. मागील काही वर्षांपासून एमआयडीसी उद्योगांकडून सेवाशुल्क घेत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर घेते. वाळूजमधील उद्योजक विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत येतात. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील राजकीय मंडळी अक्षरश: कंपन्यांच्या व्यवस्थापनावर दादागिरी करतात. कधी संगणक उचलून नेतात, तर कधी कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकतात. एक ग्रामपंचायत दोन रुपये चौरस फुटाने, तर दुसरी ग्रामपंचायत चक्क आठ रुपये चौरस फुटाने कर आकारते.अनेकदा उद्योजक प्रामाणिकपणे कर भरून मोकळे होतात. लाखो रुपये कर भरल्यानंतरही ग्रामपंचायती उद्योजकांना सुविधा कोणत्याच देत नाहीत. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवसाय करणे आता खूप अवघड होऊन बसले आहे. कारण एक उद्योग चालविण्यासाठी किती यातना सहन कराव्या लागतात हे कंपनी मालकालाच माहीत असते.