शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचा झाला खुळखुळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. शहरात पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांचे ...

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. शहरात पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांचे आयुष्य जसे संपलेले आहे तसेच अंतर्गत जलवाहिन्याही कमकुवत झाल्या आहेत. मंगळवारी शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले.

जुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागील रोडवर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी चौकात वाहत होते. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथे फुलांची झाडे विकणारे नागरिक आपल्या कुटुंबासह राहत होते. जलवाहिनी फुटल्याने या कुटुंबांची वाईट अवस्था झाली. फुटलेली जलवाहिनी एमआयडीसीची असू शकते असा युक्तिवाद महापालिकेकडून करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी कोणाची हे शोधण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत होते. पुंडलिकनगर जलकुंभावरून जाणारी ही जलवाहिनी ३०० मि.मी. व्यासाची असून, ती महापालिकेची असल्याचे उशिरा सांगण्यात आले.

मोंढ्यातील चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नव्हती. ज्या अधिकाऱ्याकडे हा परिसर आहे, त्यांनी रात्री उशिरा माहिती घेतल्यानंतर गळती असल्याचे मान्य केले, तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी काम सुरू होणार असल्याचे नमूद केले. चंपा चौक येथे मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. मात्र, या ठिकाणी गळती नसल्याचा दावा संबंधित उपअभियंता यांनी केला.