शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शहराला पाणी टंचाईच्या झळा बसणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:04 IST

औरंगाबाद : उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत, यादृष्टीने महापालिकेकडून योग्य ते नियोजन करण्यात येईल. पुढील दोन ते तीन ...

औरंगाबाद : उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत, यादृष्टीने महापालिकेकडून योग्य ते नियोजन करण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांना सांगितले.

उन्हाळा सुरू होताच शहरात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शुक्रवारी दुपारी महापालिका प्रशासन आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. औरंगाबाद शहराच्या जीवन गुणवत्तेत सुधारणा झाली आहे, याची पावती गुरुवारी केंद्र शासनाने दिली. या पत्रकार परिषदेत महापालिका आणि राज्य शासनाने केलेल्या विकास कामांची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना विचारण्यात आलेल्या पाणीप्रश्नावर देसाई म्हणाले की, राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. योजनेचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. योजना पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. तेव्हापर्यंत शहराला पाणीटंचाई भासणार नाही, याची काळजी राज्य शासन आणि महापालिका घेणार आहे. लवकरच महापालिका एक बैठक घेऊन पाणी कसे वाढवता येईल यावर निर्णय घेणार आहे.

प्रशासकांचे पूर्वीपासूनच प्रयत्न

दोन आठवड्यांपूर्वी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन, शहराचे पाणी कसे वाढवता येईल यावर चर्चा केली. ज्या ठिकाणी महापालिकेच्या जलवाहिन्या अत्यंत खराब झालेल्या आहेत तेथे समांतर दुसरी लाईन टाकून पाणी वाढविण्यासाठी किती खर्च येईल याचा प्रस्तावही पाण्डेय यांनी मागविला आहे.