शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शहराला पाणी टंचाईच्या झळा बसणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:04 IST

औरंगाबाद : उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत, यादृष्टीने महापालिकेकडून योग्य ते नियोजन करण्यात येईल. पुढील दोन ते तीन ...

औरंगाबाद : उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत, यादृष्टीने महापालिकेकडून योग्य ते नियोजन करण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांना सांगितले.

उन्हाळा सुरू होताच शहरात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शुक्रवारी दुपारी महापालिका प्रशासन आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. औरंगाबाद शहराच्या जीवन गुणवत्तेत सुधारणा झाली आहे, याची पावती गुरुवारी केंद्र शासनाने दिली. या पत्रकार परिषदेत महापालिका आणि राज्य शासनाने केलेल्या विकास कामांची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना विचारण्यात आलेल्या पाणीप्रश्नावर देसाई म्हणाले की, राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. योजनेचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. योजना पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. तेव्हापर्यंत शहराला पाणीटंचाई भासणार नाही, याची काळजी राज्य शासन आणि महापालिका घेणार आहे. लवकरच महापालिका एक बैठक घेऊन पाणी कसे वाढवता येईल यावर निर्णय घेणार आहे.

प्रशासकांचे पूर्वीपासूनच प्रयत्न

दोन आठवड्यांपूर्वी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन, शहराचे पाणी कसे वाढवता येईल यावर चर्चा केली. ज्या ठिकाणी महापालिकेच्या जलवाहिन्या अत्यंत खराब झालेल्या आहेत तेथे समांतर दुसरी लाईन टाकून पाणी वाढविण्यासाठी किती खर्च येईल याचा प्रस्तावही पाण्डेय यांनी मागविला आहे.