शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सेनेच्या मंत्र्यांमधील वाद विकोपाला, परिणाम भोगावे लागणार शहराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:03 IST

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमधील सेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसते आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि औरंगाबादचे ...

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमधील सेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसते आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या राजपटामध्ये पहिल्या चालीत तूर्त एकनाथ शिंदे गटाचा वरचष्मा दिसतो आहे.

शिवसेनेतील दोन मंत्र्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले एकनाथ शिंदे यांची वर्णी अत्यंत महत्त्वाच्या नगरविकास विभागात लावण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सुभाष देसाई आहेत. शिंदे आणि देसाई यांच्यात औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून वाद पेटला आहे. पालकमंत्र्यांच्या मर्जीतील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरही काम करीत होते. देसाई यांना विश्वासात न घेता नगर विकास विभागाने स्मार्ट सिटीच्या सीईओपदी नगर परिषद मुख्य अधिकारी दर्जाचे अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांची थेट नियुक्ती करून टाकली. यासाठी औरंगाबाद शहरातील सेनेचे एक आमदार नगरविकास विभागाकडे जोरदार पाठपुरावा करीत होते, अशी चर्चा आहे. मनोहरे यांच्या नियुक्तीनंतर लगेच पालकमंत्र्यांनी तोंडी स्थगितीही देऊन टाकली. त्यामुळे मनोहरे यांना तब्बल १८ दिवस रुजू होता आले नाही. शेवटी सोमवारी (दि.२१) ते स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रुजू झाले. एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. शिंदे गट सध्या वरचढ दिसून येत असला तरी अनुभवी देसाई गट यावर कशा पद्धतीने मात करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहराचे नुकसान होणार हे निश्चित

पालकमंत्री आणि नगरविकासमंत्री यांच्या आपसातील वादामुळे शहराला परिणाम भोगावे लागणार हे निश्चित आहे. भविष्यात औरंगाबाद महापालिकेने आपला वाटा योजनेत टाकला नाही, तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे रखडणार आहेत.