शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८६, रिकव्हरी रेट ९६.२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी रेट ९६.२८ टक्के एवढा मंगळवारी नोंदविण्यात आला. १ जूनपासून राज्य शासन निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी आणि रिकव्हरी रेटचे आकडे यासाठी सहायक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संक्रमण निश्चित कमी झाले असले तरी धोका अद्याप टळलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लसीकरण, लॉकडाऊन आदी कारणांमुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात १०० नागरिकांची तपासणी केली, तर त्यातील ३४ जण पॉझिटिव्ह येत होते. संक्रमणाचे हे आकडे आरोग्य आणि शासकीय यंत्रणेला थक्क करणारे होते. आता शंभर नागरिकांची तपासणी केली तर फक्त चारजण बाधित आढळून येत आहेत. बाधित आढळून आलेल्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक नुकसान म्हणजे जीवितहानीचे झालेले आहे. काही दिवसांपासून सुरू असलेले मृत्युसत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. शहरात दररोज किमान दहा, तर जिल्ह्यात १७ ते २४ रुग्णांचा मृत्यू होत आहे. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसह आता ३० ते ३५ वयोगटांतील तरुणही मृत्युमुखी पडत आहेत. मागील महिन्यात कोरोना संशयित म्हणून मरण पावलेल्या रुग्णांची संख्या तब्बल १७०० होती. सध्याही कोरोना आणि संशयितांचा आकडा प्रचंड वाढलेला आहे. मात्र शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.