शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८६, रिकव्हरी रेट ९६.२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी रेट ९६.२८ टक्के एवढा मंगळवारी नोंदविण्यात आला. १ जूनपासून राज्य शासन निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी आणि रिकव्हरी रेटचे आकडे यासाठी सहायक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संक्रमण निश्चित कमी झाले असले तरी धोका अद्याप टळलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लसीकरण, लॉकडाऊन आदी कारणांमुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात १०० नागरिकांची तपासणी केली, तर त्यातील ३४ जण पॉझिटिव्ह येत होते. संक्रमणाचे हे आकडे आरोग्य आणि शासकीय यंत्रणेला थक्क करणारे होते. आता शंभर नागरिकांची तपासणी केली तर फक्त चारजण बाधित आढळून येत आहेत. बाधित आढळून आलेल्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक नुकसान म्हणजे जीवितहानीचे झालेले आहे. काही दिवसांपासून सुरू असलेले मृत्युसत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. शहरात दररोज किमान दहा, तर जिल्ह्यात १७ ते २४ रुग्णांचा मृत्यू होत आहे. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसह आता ३० ते ३५ वयोगटांतील तरुणही मृत्युमुखी पडत आहेत. मागील महिन्यात कोरोना संशयित म्हणून मरण पावलेल्या रुग्णांची संख्या तब्बल १७०० होती. सध्याही कोरोना आणि संशयितांचा आकडा प्रचंड वाढलेला आहे. मात्र शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.