शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सिटी गेस्ट .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:02 IST

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ ...

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ टक्के रोजगाराच्या संधी ‘एमएसएमई’ने उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘जीडीपी’मध्ये या उद्योगाचे मोठे योगदान आहे; परंतु आज हा उद्योग अडचणीत सापडला असून, केंद्र व राज्य शासनाने या उद्योगाला विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली पाहिजे...........................................................................सध्या मुंबई, पुणे या महानगरांच्या तुलनेत औरंगाबादेतील वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहत तसेच ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात जागा आहे. पायाभूत सुविधा आहेत. येथे वीज, पाणी, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही मोठे उद्योग येण्यासाठी धजावत नाहीत, यावर ‘मासिआ’ या उद्योग संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार म्हणाले, येथे नवीन पायलट प्रोजेक्ट आले, तर त्याचा फायदा प्रामुख्याने ‘एमएसएमई’ला होईल. ‘एमएसएमई’द्वारे अकुशल तरुणांंना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. अनेक ‘स्टार्ट अप’ तयार होतील. मात्र, येथे सर्व सुविधा असतानाही देश- विदेशातील मोठे गुंतवणूकदार न येण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे; पण अजूनही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झालेली नाही. आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव असताना अजिंठा, वेरुळसारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांना जाण्यासाठी अजूनही चांगले रस्ते नाहीत. यातुलनेत पुण्याला थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे. ‘जेएनपीटी’साठी रोड कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे राज्यात येणारे मोठे उद्योग चाकण, तळेगाव किंवा रांजणगावला प्राधान्य देतात. जेव्हा राज्यात गुंतवणुकीसंबंधी शासनासोबत चर्चा करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा देशातील मोठ्या उद्योगांचे शिष्टमंडळ येत असतात, तेव्हा ते औरंगाबाद ऐवजी पुण्या-मुंबईलाच पसंती देतात. यासाठी चर्चेच्या वेळी औरंगाबादेतील उद्योग घटकांना निमंत्रित केले, तर गुंतवणुकीसाठी अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादेत योग्य वातावरण, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, शैक्षणिक तसेच आरोग्याबाबतच्या सुविधा उत्तम आहेत, हे त्यांना पटवून देता येईल.

कोरोनाकाळातील मागील दीड वर्षांत ‘एमएसएमई’ आर्थिक अडचणीत सापडली आहे. या उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असावी. या उद्योगांंना सबसिडीचा निधी नियमित मिळाला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील २० टक्के काम या उद्योगांंना मिळाले पाहिजे. मात्र, वास्तवात तसे घडत नाही.

- नारायण पवार, अध्यक्ष, ‘मासिआ’