शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिटी गेस्ट .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:02 IST

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ ...

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ टक्के रोजगाराच्या संधी ‘एमएसएमई’ने उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘जीडीपी’मध्ये या उद्योगाचे मोठे योगदान आहे; परंतु आज हा उद्योग अडचणीत सापडला असून, केंद्र व राज्य शासनाने या उद्योगाला विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली पाहिजे...........................................................................सध्या मुंबई, पुणे या महानगरांच्या तुलनेत औरंगाबादेतील वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहत तसेच ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात जागा आहे. पायाभूत सुविधा आहेत. येथे वीज, पाणी, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही मोठे उद्योग येण्यासाठी धजावत नाहीत, यावर ‘मासिआ’ या उद्योग संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार म्हणाले, येथे नवीन पायलट प्रोजेक्ट आले, तर त्याचा फायदा प्रामुख्याने ‘एमएसएमई’ला होईल. ‘एमएसएमई’द्वारे अकुशल तरुणांंना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. अनेक ‘स्टार्ट अप’ तयार होतील. मात्र, येथे सर्व सुविधा असतानाही देश- विदेशातील मोठे गुंतवणूकदार न येण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे; पण अजूनही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झालेली नाही. आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव असताना अजिंठा, वेरुळसारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांना जाण्यासाठी अजूनही चांगले रस्ते नाहीत. यातुलनेत पुण्याला थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे. ‘जेएनपीटी’साठी रोड कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे राज्यात येणारे मोठे उद्योग चाकण, तळेगाव किंवा रांजणगावला प्राधान्य देतात. जेव्हा राज्यात गुंतवणुकीसंबंधी शासनासोबत चर्चा करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा देशातील मोठ्या उद्योगांचे शिष्टमंडळ येत असतात, तेव्हा ते औरंगाबाद ऐवजी पुण्या-मुंबईलाच पसंती देतात. यासाठी चर्चेच्या वेळी औरंगाबादेतील उद्योग घटकांना निमंत्रित केले, तर गुंतवणुकीसाठी अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादेत योग्य वातावरण, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, शैक्षणिक तसेच आरोग्याबाबतच्या सुविधा उत्तम आहेत, हे त्यांना पटवून देता येईल.

कोरोनाकाळातील मागील दीड वर्षांत ‘एमएसएमई’ आर्थिक अडचणीत सापडली आहे. या उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असावी. या उद्योगांंना सबसिडीचा निधी नियमित मिळाला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील २० टक्के काम या उद्योगांंना मिळाले पाहिजे. मात्र, वास्तवात तसे घडत नाही.

- नारायण पवार, अध्यक्ष, ‘मासिआ’