शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

सिटी गेस्ट .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:02 IST

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ ...

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ टक्के रोजगाराच्या संधी ‘एमएसएमई’ने उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘जीडीपी’मध्ये या उद्योगाचे मोठे योगदान आहे; परंतु आज हा उद्योग अडचणीत सापडला असून, केंद्र व राज्य शासनाने या उद्योगाला विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली पाहिजे...........................................................................सध्या मुंबई, पुणे या महानगरांच्या तुलनेत औरंगाबादेतील वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहत तसेच ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात जागा आहे. पायाभूत सुविधा आहेत. येथे वीज, पाणी, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही मोठे उद्योग येण्यासाठी धजावत नाहीत, यावर ‘मासिआ’ या उद्योग संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार म्हणाले, येथे नवीन पायलट प्रोजेक्ट आले, तर त्याचा फायदा प्रामुख्याने ‘एमएसएमई’ला होईल. ‘एमएसएमई’द्वारे अकुशल तरुणांंना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. अनेक ‘स्टार्ट अप’ तयार होतील. मात्र, येथे सर्व सुविधा असतानाही देश- विदेशातील मोठे गुंतवणूकदार न येण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे; पण अजूनही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झालेली नाही. आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव असताना अजिंठा, वेरुळसारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांना जाण्यासाठी अजूनही चांगले रस्ते नाहीत. यातुलनेत पुण्याला थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे. ‘जेएनपीटी’साठी रोड कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे राज्यात येणारे मोठे उद्योग चाकण, तळेगाव किंवा रांजणगावला प्राधान्य देतात. जेव्हा राज्यात गुंतवणुकीसंबंधी शासनासोबत चर्चा करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा देशातील मोठ्या उद्योगांचे शिष्टमंडळ येत असतात, तेव्हा ते औरंगाबाद ऐवजी पुण्या-मुंबईलाच पसंती देतात. यासाठी चर्चेच्या वेळी औरंगाबादेतील उद्योग घटकांना निमंत्रित केले, तर गुंतवणुकीसाठी अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादेत योग्य वातावरण, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, शैक्षणिक तसेच आरोग्याबाबतच्या सुविधा उत्तम आहेत, हे त्यांना पटवून देता येईल.

कोरोनाकाळातील मागील दीड वर्षांत ‘एमएसएमई’ आर्थिक अडचणीत सापडली आहे. या उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असावी. या उद्योगांंना सबसिडीचा निधी नियमित मिळाला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील २० टक्के काम या उद्योगांंना मिळाले पाहिजे. मात्र, वास्तवात तसे घडत नाही.

- नारायण पवार, अध्यक्ष, ‘मासिआ’