शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सिटी गेस्ट .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:02 IST

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ ...

औरंगाबादेत सुमारे अडीच हजार लघु उद्योग आहेत. या उद्योगांत सध्या अडिच ते तीन लाख कामगार काम करतात. देशात ४३ टक्के रोजगाराच्या संधी ‘एमएसएमई’ने उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘जीडीपी’मध्ये या उद्योगाचे मोठे योगदान आहे; परंतु आज हा उद्योग अडचणीत सापडला असून, केंद्र व राज्य शासनाने या उद्योगाला विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली पाहिजे...........................................................................सध्या मुंबई, पुणे या महानगरांच्या तुलनेत औरंगाबादेतील वाळूज, शेंद्रा औद्योगिक वसाहत तसेच ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात जागा आहे. पायाभूत सुविधा आहेत. येथे वीज, पाणी, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही मोठे उद्योग येण्यासाठी धजावत नाहीत, यावर ‘मासिआ’ या उद्योग संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार म्हणाले, येथे नवीन पायलट प्रोजेक्ट आले, तर त्याचा फायदा प्रामुख्याने ‘एमएसएमई’ला होईल. ‘एमएसएमई’द्वारे अकुशल तरुणांंना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. अनेक ‘स्टार्ट अप’ तयार होतील. मात्र, येथे सर्व सुविधा असतानाही देश- विदेशातील मोठे गुंतवणूकदार न येण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे; पण अजूनही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झालेली नाही. आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव असताना अजिंठा, वेरुळसारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांना जाण्यासाठी अजूनही चांगले रस्ते नाहीत. यातुलनेत पुण्याला थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे. ‘जेएनपीटी’साठी रोड कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे राज्यात येणारे मोठे उद्योग चाकण, तळेगाव किंवा रांजणगावला प्राधान्य देतात. जेव्हा राज्यात गुंतवणुकीसंबंधी शासनासोबत चर्चा करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा देशातील मोठ्या उद्योगांचे शिष्टमंडळ येत असतात, तेव्हा ते औरंगाबाद ऐवजी पुण्या-मुंबईलाच पसंती देतात. यासाठी चर्चेच्या वेळी औरंगाबादेतील उद्योग घटकांना निमंत्रित केले, तर गुंतवणुकीसाठी अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादेत योग्य वातावरण, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, शैक्षणिक तसेच आरोग्याबाबतच्या सुविधा उत्तम आहेत, हे त्यांना पटवून देता येईल.

कोरोनाकाळातील मागील दीड वर्षांत ‘एमएसएमई’ आर्थिक अडचणीत सापडली आहे. या उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असावी. या उद्योगांंना सबसिडीचा निधी नियमित मिळाला पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील २० टक्के काम या उद्योगांंना मिळाले पाहिजे. मात्र, वास्तवात तसे घडत नाही.

- नारायण पवार, अध्यक्ष, ‘मासिआ’