शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

शहराला टंचाईच्या झळा

By admin | Updated: July 5, 2014 00:35 IST

परभणी : राहाटी बंधारा आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील प्रत्येकी दोन विद्युत मोटारी पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

परभणी : राहाटी बंधारा आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील प्रत्येकी दोन विद्युत मोटारी पंधरा दिवसांपासून नादुरुस्त असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.परभणी शहराला राहाटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधाऱ्यावर चार विद्युत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करुन हे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातून परभणी शहरापर्यंत पोहोचते. पंधरा दिवसांपासून राहाटी बंधाऱ्यावरील दोन विद्युत मोटारी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे दोन मोटारीतूनच पाणी उपसण्याचे काम चालते. दोनच मोटारींद्वारे पाणी उपसल्या जात असल्याने परभणी शहरातील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रावरील दोन विद्युत मोटारीदेखील बंद आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यात मोठा व्यत्यय येतो. सध्या नळांना दहा दिवसांतून एक वेळ पाणी येत आहे. शहरात पाणी सोडल्यानंतरही ते किती वेळ सोडावे, कोणत्या भागात सोडावे, याचे नियोजन नाही. त्यामुळे ठराविक भागातच दोन-दोन वेळा पाणी येते. त्याचप्रमाणे एकदा पाणी सोडल्यास ते बराच वेळ बंद केले जात नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो. आणखी एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्यात आहे. परंतु केवळ नियोजनाअभावी नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेने विद्युत मोटारींची तत्काळ दुरूस्ती करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पाण्याच्या टाकीवर कॅमेरे बसवाशहरात विद्यानगर येथे २, खंडोबा बाजार, खाजा कॉलनी, युसूफ कॉलनी, ममता कॉलनी, एम.आय.डी.सी., राजगोपालाचारी उद्यान या ठिकाणी प्रत्येकी एक अशा सात पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांवरुन नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु काही भागात डबल पाणीपुरवठा होतो तर काही भाग वंचित राहतो. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी होत आहे.मनपाचे आवाहनशहरातील अनेक भागात नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी आल्यानंतर नळाद्वारेदेखील पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून घ्याव्यात व पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.वाहिनीला अनेक भागात गळती परभणी शहरात अंथरलेली जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. त्यामुळे जलवाहिनी जागोजागी फुटलेली आहे. या लिकेजेसमधून बरेच पाणी वाया जाते. महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी लिकेज काढण्याचे काम हाती घेतले. रस्त्यांचे डांबरीकरण होत असताना ६० ते ७० टक्के लिकेजेस् काढण्यात आले आहेत. परंतु अजूनही अनेक भागात जलवाहिनी फुटलेली असून, ती दुरुस्त केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.