शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जनतेची पाण्यासाठी भटकंती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:21 IST

शहरातील अनेक वसाहतींमध्ये सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणीच मिळाले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींमध्ये सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणीच मिळाले नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागला. पिण्यासाठीही अनेक घरांमध्ये पाणी नसल्याने २० ते ३० रुपये खर्च करून पाण्याचे जार आणावे लागले. पाणी कधी येईल, याची माहिती मनपा अधिकारी व कर्मचा-यांकडून देण्यात येत नव्हती. नागरिकांनी लोकप्रतिनिधींना पाण्यासाठी भंडावून सोडले होते.नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, पुंडलिकनगर, सिडको एन-२, बेगमपुरा परिसर, हनुमान टेकडी, विद्युत कॉलनी, स्वामी विवेकानंदनगर हडको, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर, जाधववाडी, बुढीलेन, लोटाकारंजा, शहागंज आदी कितीतरी वसाहतींमध्ये सोमवारी पाणी आले नाही. मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना सोमवारी कामकाजाच्या दिवशी पाण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेक मोठ्या सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये खाजगी पाण्याचे टँकर पाणी देत असल्याचे दिसून आले. जाधववाडी भागात तर पावसाचे पाणी छतावरून खाली कोसळत असताना नागरिकांनी ड्रम लावून भरून घेतले. धुणी, भांडी आदी वापरासाठी पाणी कामाला येईल, असेही काही नागरिकांनी सांगितले.दूषित पाण्याच्या तक्रारीरामनगर, सिंहगड कॉलनी आदी वसाहतींमध्ये दूषित पाणी आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात आले त्यांच्या पाण्यात क्लोरिनचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते. पाण्यात क्लोरिनचा प्रचंड वास येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.पर्यायी व्यवस्थाच नाहीमहापालिकेने खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमाने टँकरची व्यवस्था मजबूत केली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून ज्या वसाहतींना पाणी मिळाले नाही, त्यांना टँकरद्वारेही पाणी देण्याची तसदी मनपा प्रशासनाने घेतली नाही.तक्रारींचा महापूरमहापौर बापू घडमोडे यांनी सांगितले की, शहरात पाणी आले नाही, म्हणून प्रचंड तक्रारी आहेत. असंख्य नागरिक पाणी आले नाही, तरीही सहन करीत आहेत. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर येऊन संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला. प्रशासनाने युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करायला हवा.