शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

निर्णयाच्या बदलास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:10 IST

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती देखील काही नागरिकांनी केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती देखील काही नागरिकांनी केली आहे़राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ५०० मीटरच्या अंतरात दारु विक्रीची दुकाने चालविण्यास बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता़ या निर्णयामुळे अनेकांची अडचण झाली़ छुप्या पद्धतीने शहरी भागात दारु दुकाने थाटली जावू लागली़ दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने याच संदर्भात आणखी एक निर्णय देत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून जाणाºया राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारू दुकान सुरू करण्यास मान्यता दिली आहे़ न्यायालयाच्या या निर्णयानंतर परभणीत नागरिकांचे सर्व्हेक्षण केले़ तेव्हा अनेक नागरिकांनी निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले़दारु दुकानासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने निर्णयात केलेला बदल योग्य वाटतो का? या प्रश्नावर ७२ टक्के नागरिकांनी नाही, असे उत्तर दिले आहे़ २२ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर ६ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे़ नगरपालिका, मनपा हद्दीत मुख्य मार्गावर दारु विक्रीची दुकाने सुरू झाल्यास अपघातांची संख्या वाढेल का? या प्रश्नावर ७६ टक्के नागरिकांनी अपघात वाढतील, असे म्हटले आहे़ १० टक्के नागरिकांनी नाही, असे म्हटले तर १४ टक्के नागरिकांनी कोणतेही उत्तर दिले नाही़सर्वोच्च न्यायालयाच्या दुसºया निर्णयाविषयी आश्चर्य तर व्यक्त होतच आहे़ शिवाय या निर्णयासंदर्भात फेरविचार व्हावा, अशी विनंती देखील केली जात आहे़ हा निर्णय दबावाखाली घेतला असावा, अशी शंका निर्माण होऊ शकते़ त्यामुळे याच अनुषंगाने दबावाखाली येवून न्यायालयाने निर्णय घेतला असेल का? असा प्रश्न केला तेव्हा नागरिकांनी तोलून मापून उत्तर दिले आहे़ ३६ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर ३६ टक्केच नागरिकांनी नाही म्हटले़ २८ टक्के नागरिकांनी मात्र कोणतेही उत्तर दिले नाही़ त्यामुळे न्यायालयाचा निर्णय पटला नसला तरी नागरिकांनी न्यायालयावर देखील आपला तेवढाच विश्वास असल्याचे या सर्वेक्षणातून नमूद केले आहे़ राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दारुची दुकाने असल्यानेच अपघातांमध्ये वाढ होत आहे़ ही दुकाने या ठिकाणाहून हटविली तर अपघात कमी होतील, या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचा निर्णय घेतला होता़ हा निर्णय योग्य होता़ परंतु, त्यानंतर शहरी भागात राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारू दुकान सुरू करण्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे़ त्यामुळे शहरी भागात अपघात वाढणार नाहीत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.