शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

निर्णयाच्या बदलास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:10 IST

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती देखील काही नागरिकांनी केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती देखील काही नागरिकांनी केली आहे़राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ५०० मीटरच्या अंतरात दारु विक्रीची दुकाने चालविण्यास बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता़ या निर्णयामुळे अनेकांची अडचण झाली़ छुप्या पद्धतीने शहरी भागात दारु दुकाने थाटली जावू लागली़ दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने याच संदर्भात आणखी एक निर्णय देत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून जाणाºया राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारू दुकान सुरू करण्यास मान्यता दिली आहे़ न्यायालयाच्या या निर्णयानंतर परभणीत नागरिकांचे सर्व्हेक्षण केले़ तेव्हा अनेक नागरिकांनी निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले़दारु दुकानासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने निर्णयात केलेला बदल योग्य वाटतो का? या प्रश्नावर ७२ टक्के नागरिकांनी नाही, असे उत्तर दिले आहे़ २२ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर ६ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे़ नगरपालिका, मनपा हद्दीत मुख्य मार्गावर दारु विक्रीची दुकाने सुरू झाल्यास अपघातांची संख्या वाढेल का? या प्रश्नावर ७६ टक्के नागरिकांनी अपघात वाढतील, असे म्हटले आहे़ १० टक्के नागरिकांनी नाही, असे म्हटले तर १४ टक्के नागरिकांनी कोणतेही उत्तर दिले नाही़सर्वोच्च न्यायालयाच्या दुसºया निर्णयाविषयी आश्चर्य तर व्यक्त होतच आहे़ शिवाय या निर्णयासंदर्भात फेरविचार व्हावा, अशी विनंती देखील केली जात आहे़ हा निर्णय दबावाखाली घेतला असावा, अशी शंका निर्माण होऊ शकते़ त्यामुळे याच अनुषंगाने दबावाखाली येवून न्यायालयाने निर्णय घेतला असेल का? असा प्रश्न केला तेव्हा नागरिकांनी तोलून मापून उत्तर दिले आहे़ ३६ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर ३६ टक्केच नागरिकांनी नाही म्हटले़ २८ टक्के नागरिकांनी मात्र कोणतेही उत्तर दिले नाही़ त्यामुळे न्यायालयाचा निर्णय पटला नसला तरी नागरिकांनी न्यायालयावर देखील आपला तेवढाच विश्वास असल्याचे या सर्वेक्षणातून नमूद केले आहे़ राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दारुची दुकाने असल्यानेच अपघातांमध्ये वाढ होत आहे़ ही दुकाने या ठिकाणाहून हटविली तर अपघात कमी होतील, या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचा निर्णय घेतला होता़ हा निर्णय योग्य होता़ परंतु, त्यानंतर शहरी भागात राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारू दुकान सुरू करण्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे़ त्यामुळे शहरी भागात अपघात वाढणार नाहीत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.