शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाडापाडीसाठी नागरिकच आता सरसावले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:30 IST

जयभवानीनगर भागातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारीही सुरूच होती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर भागातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारीही सुरूच होती. पहिल्या व दुस-या दिवशी महापालिकेने जेसीबीच्या साह्याने १८ इमारती जमीनदोस्त केल्या. तिस-या दिवशी स्वत:हून नागरिकांनी आपली अतिक्रमणे कटर लावून काढण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. मनपाला या भागातील १३८ अतिक्रमणे हटवायची आहेत.जयभवानीनगर परिसर अल्पावधीत मूलभूत सोयी-सुविधांयुक्त झाला. रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी मुबलक सोयी-सुविधा या भागात उपलब्ध झाल्याने जमिनींचा भाव आकाशाला गवसणी घालू लागला. हा संपूर्ण परिसर गुंठेवारीत असेल यावर कोणाचाही विश्वासच बसणार नाही. टुमदार इमारती, गजबजलेली बाजारपेठ या भागाचे आकर्षण केंद्र ठरू लागली. प्लॉटसाठी कुठेच जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाल्यावर मोठमोठ्या इमारती बांधून टाकल्या.मागील १२ ते १५ वर्षांमध्ये ही अतिक्रमणे झाली. लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, अलीकडे मोठा पाऊस झाल्यास जयभवानीनगर संपूर्ण पाण्याखाली येऊ लागले. अनेक घरांमध्ये पाणी शिरू लागले. त्यानंतर नाल्यातील अतिक्रमणांची ओरड सुरू झाली. मागील एक वर्षापासून महापालिकेत अतिक्रमणांचा मुद्या गाजत होता. शेवटी मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत बुधवारपासून पाडापाडी मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला. नंतर मनपा प्रशासन कारवाईवर ठाम राहत पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली. त्यामुळे अतिक्रमण करणारे नागरिक बॅकफुटवर आले. पहिल्याच दिवशी मनपाने ४ मोठी अतिक्रमणे काढली. दुसºया दिवशी १४ अतिक्रमणे पाडण्यात आली. तिस-या दिवशी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. यासाठी भाडेतत्त्वावर कटर आणण्यात आले. जेसीबीने मोठमोठ्या इमारती पाडल्यास मोठे नुकसान होईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी कटर लावून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांनी दिली. शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची पाहणी केली.पंधरा दिवस कारवाई चालणारजयभवानीनगर येथील मुख्य नाल्यावर १३८ मालमत्ताधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. मनपाला आणखी ११८ इमारती पाडावयाच्या आहेत. किमान १५ दिवस तरी ही कारवाई चालणार आहे. जोपर्यंत संपूर्ण नाला मोकळा होणार नाही, तोपर्यंत मनपाने कारवाई थांबवू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्याआहेत.