शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाडापाडीसाठी नागरिकच आता सरसावले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:30 IST

जयभवानीनगर भागातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारीही सुरूच होती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर भागातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारीही सुरूच होती. पहिल्या व दुस-या दिवशी महापालिकेने जेसीबीच्या साह्याने १८ इमारती जमीनदोस्त केल्या. तिस-या दिवशी स्वत:हून नागरिकांनी आपली अतिक्रमणे कटर लावून काढण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. मनपाला या भागातील १३८ अतिक्रमणे हटवायची आहेत.जयभवानीनगर परिसर अल्पावधीत मूलभूत सोयी-सुविधांयुक्त झाला. रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी मुबलक सोयी-सुविधा या भागात उपलब्ध झाल्याने जमिनींचा भाव आकाशाला गवसणी घालू लागला. हा संपूर्ण परिसर गुंठेवारीत असेल यावर कोणाचाही विश्वासच बसणार नाही. टुमदार इमारती, गजबजलेली बाजारपेठ या भागाचे आकर्षण केंद्र ठरू लागली. प्लॉटसाठी कुठेच जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाल्यावर मोठमोठ्या इमारती बांधून टाकल्या.मागील १२ ते १५ वर्षांमध्ये ही अतिक्रमणे झाली. लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, अलीकडे मोठा पाऊस झाल्यास जयभवानीनगर संपूर्ण पाण्याखाली येऊ लागले. अनेक घरांमध्ये पाणी शिरू लागले. त्यानंतर नाल्यातील अतिक्रमणांची ओरड सुरू झाली. मागील एक वर्षापासून महापालिकेत अतिक्रमणांचा मुद्या गाजत होता. शेवटी मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत बुधवारपासून पाडापाडी मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला. नंतर मनपा प्रशासन कारवाईवर ठाम राहत पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली. त्यामुळे अतिक्रमण करणारे नागरिक बॅकफुटवर आले. पहिल्याच दिवशी मनपाने ४ मोठी अतिक्रमणे काढली. दुसºया दिवशी १४ अतिक्रमणे पाडण्यात आली. तिस-या दिवशी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. यासाठी भाडेतत्त्वावर कटर आणण्यात आले. जेसीबीने मोठमोठ्या इमारती पाडल्यास मोठे नुकसान होईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी कटर लावून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांनी दिली. शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची पाहणी केली.पंधरा दिवस कारवाई चालणारजयभवानीनगर येथील मुख्य नाल्यावर १३८ मालमत्ताधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. मनपाला आणखी ११८ इमारती पाडावयाच्या आहेत. किमान १५ दिवस तरी ही कारवाई चालणार आहे. जोपर्यंत संपूर्ण नाला मोकळा होणार नाही, तोपर्यंत मनपाने कारवाई थांबवू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्याआहेत.