शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

शहर बसअभावी नागरिकांची पायपीट

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. शहर बस सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावाला एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही गोलवाडी विकासापासून कोसो दूर आहे. साधी शहर बसची सुविधा नाही. नागरिकांना दररोज दोन कि़ मी. गोलवाडी फाट्यापर्यंत पायपीट करावी लागते. येथेही बस थांबेल की नाही याची खात्री नाही. गावातील ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी शहरात शिक्षण घेतात. सर्वांनी बसचे पास काढले आहेत. परंतु गावात शहर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना रोज गाव ते औरंगाबाद- नगर रस्ता, असा पायी प्रवास करतच ये-जा करावी लागत आहे. बहुतांशी बस बजाजनगर, पंढरपूर येथूनच भरून येतात. त्यामुळे बसचालक गोलवाडी फाट्यावर बस उभी न करता निघून जातात. महिन्याचा बस पास असूनही खाजगी वाहनाने ये-जा करावी लागत असल्याने अधिकचा भुर्दंडही विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. खाजगी वाहनांच्या असुरक्षित प्रवासामुळे मुलींना शाळेत पाठवायला बहुतांशी पालक असमर्थता दाखवत आहेत. वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तास बुडत असून, नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय व शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने १९ आॅगस्टला एस. टी. महामंडळाला पत्र देऊन गोलवाडी ते औरंगपुरा शहर बस सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु एस. टी. महामंडळाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. एस. टी. महामंडळाने गोलवाडीसाठी स्वतंत्र शहर बस सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुभान शेख, उपसरपंच यमुना धोंडरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जैस्वाल, शांताबाई कीर्तिशाही, केरुबा कसारे, आरती सलामपुरे, छगन सलामपुरे, किसन धांडे, गंगाराम कणसे, प्रभात तिरछे, आकाश सलामपुरे, शामा केवट, धोंडिराम सलामपुरे, अजय चौधरी, राजू सलामपुरे, सीता तिरछे, कमलेश सलामपुरे आदी गावकऱ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोलवाडी ग्रामपंचायतीचे आलेले पत्र तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.