शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शहर बसअभावी नागरिकांची पायपीट

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. शहर बस सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावाला एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही गोलवाडी विकासापासून कोसो दूर आहे. साधी शहर बसची सुविधा नाही. नागरिकांना दररोज दोन कि़ मी. गोलवाडी फाट्यापर्यंत पायपीट करावी लागते. येथेही बस थांबेल की नाही याची खात्री नाही. गावातील ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी शहरात शिक्षण घेतात. सर्वांनी बसचे पास काढले आहेत. परंतु गावात शहर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना रोज गाव ते औरंगाबाद- नगर रस्ता, असा पायी प्रवास करतच ये-जा करावी लागत आहे. बहुतांशी बस बजाजनगर, पंढरपूर येथूनच भरून येतात. त्यामुळे बसचालक गोलवाडी फाट्यावर बस उभी न करता निघून जातात. महिन्याचा बस पास असूनही खाजगी वाहनाने ये-जा करावी लागत असल्याने अधिकचा भुर्दंडही विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. खाजगी वाहनांच्या असुरक्षित प्रवासामुळे मुलींना शाळेत पाठवायला बहुतांशी पालक असमर्थता दाखवत आहेत. वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तास बुडत असून, नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय व शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने १९ आॅगस्टला एस. टी. महामंडळाला पत्र देऊन गोलवाडी ते औरंगपुरा शहर बस सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु एस. टी. महामंडळाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. एस. टी. महामंडळाने गोलवाडीसाठी स्वतंत्र शहर बस सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुभान शेख, उपसरपंच यमुना धोंडरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जैस्वाल, शांताबाई कीर्तिशाही, केरुबा कसारे, आरती सलामपुरे, छगन सलामपुरे, किसन धांडे, गंगाराम कणसे, प्रभात तिरछे, आकाश सलामपुरे, शामा केवट, धोंडिराम सलामपुरे, अजय चौधरी, राजू सलामपुरे, सीता तिरछे, कमलेश सलामपुरे आदी गावकऱ्यांकडून केली जात आहे. यासंदर्भात एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोलवाडी ग्रामपंचायतीचे आलेले पत्र तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.