शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

भीमनगरातील नागरिक हवालदिल

By admin | Updated: September 8, 2015 00:38 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ विश्रांतीनगर आणि जयभवानीनगरात पाडापाडीची मोहीम राबविल्यानंतर मनपाने आता भीमनगर भागातही एका रस्त्याची मार्किंग केली आहे

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ विश्रांतीनगर आणि जयभवानीनगरात पाडापाडीची मोहीम राबविल्यानंतर मनपाने आता भीमनगर भागातही एका रस्त्याची मार्किंग केली आहे. यामध्ये सुमारे शंभर घरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मनपाच्या अधिकाऱ्यांनी केवळ एकाच बाजूने जास्तीची मार्किंग केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.महानगरपालिकेने विकास आराखड्यातील ८० फुटांचा एक रस्ता मोकळा करण्यासाठी आठवडाभरापूर्वी विश्रांतीनगर आणि जयभवानीनगर भागात पाडापाडीची मोहीम केली. त्यानंतर याच भागात आता शिवाजीनगर- रामनगर रस्त्याआड येणाऱ्या इमारती पाडल्या जाणार आहेत. त्यातच मनपाच्या पथकाने शनिवारी भावसिंगपुऱ्यातील भीमनगरमध्येही एका रस्त्यासाठी मार्किंगची कारवाई केली. याठिकाणी रमाबाई चौक ते अमिन चौक या भागात ही मार्किंग करण्यात आली आहे. सध्या येथे काही भागात ४० फूट तर काही ठिकाणी ५० फुटांचा रस्ता आहे. मनपाच्या पथकाने येथे सुमारे सहाशे मीटरपर्यंत शंभर फुटांची आणि पुढे पन्नास फुटांच्या रस्त्याची मार्किंग केली आहे. यामध्ये येथील सुमारे शंभरहून अधिक घरांचा बराचसा भाग जात आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सुमारे दहा वर्षांपासून या रस्त्याचा विषय चर्चेत आहे. २००४ साली आणि त्यानंतरही काही वेळा येथे मार्किंग झाले होते. परंतु नंतर हा विषय शांत झाला. येथे काही लोक २०-३० वर्षांपासून राहत आहेत. आता मनपाने पुन्हा मार्किंग केले आहे. हे मार्किंग करतानाही रस्त्याचा मध्य काढलेला नाही. उलट एकाच बाजूने जास्त प्रमाणात रस्ता दाखविला आहे. मनपाने हा रस्ता रद्द करावा, अशी मागणी पीटर सुधाकर बत्तीसे, संदीप आरसूड, रमेश इंगळे, सय्यद शाकेर आदींनी केली आहे.अधिकारी गप्प...मनपाच्या नगररचना विभागातर्फे शनिवारी या ठिकाणी मार्किंग करण्यात आली. मात्र याविषयी नगररचना विभागातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. दुसरीकडे वारंवार प्रयत्न करूनही सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.