शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भीमनगरातील नागरिक हवालदिल

By admin | Updated: September 8, 2015 00:38 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ विश्रांतीनगर आणि जयभवानीनगरात पाडापाडीची मोहीम राबविल्यानंतर मनपाने आता भीमनगर भागातही एका रस्त्याची मार्किंग केली आहे

औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ विश्रांतीनगर आणि जयभवानीनगरात पाडापाडीची मोहीम राबविल्यानंतर मनपाने आता भीमनगर भागातही एका रस्त्याची मार्किंग केली आहे. यामध्ये सुमारे शंभर घरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मनपाच्या अधिकाऱ्यांनी केवळ एकाच बाजूने जास्तीची मार्किंग केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.महानगरपालिकेने विकास आराखड्यातील ८० फुटांचा एक रस्ता मोकळा करण्यासाठी आठवडाभरापूर्वी विश्रांतीनगर आणि जयभवानीनगर भागात पाडापाडीची मोहीम केली. त्यानंतर याच भागात आता शिवाजीनगर- रामनगर रस्त्याआड येणाऱ्या इमारती पाडल्या जाणार आहेत. त्यातच मनपाच्या पथकाने शनिवारी भावसिंगपुऱ्यातील भीमनगरमध्येही एका रस्त्यासाठी मार्किंगची कारवाई केली. याठिकाणी रमाबाई चौक ते अमिन चौक या भागात ही मार्किंग करण्यात आली आहे. सध्या येथे काही भागात ४० फूट तर काही ठिकाणी ५० फुटांचा रस्ता आहे. मनपाच्या पथकाने येथे सुमारे सहाशे मीटरपर्यंत शंभर फुटांची आणि पुढे पन्नास फुटांच्या रस्त्याची मार्किंग केली आहे. यामध्ये येथील सुमारे शंभरहून अधिक घरांचा बराचसा भाग जात आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सुमारे दहा वर्षांपासून या रस्त्याचा विषय चर्चेत आहे. २००४ साली आणि त्यानंतरही काही वेळा येथे मार्किंग झाले होते. परंतु नंतर हा विषय शांत झाला. येथे काही लोक २०-३० वर्षांपासून राहत आहेत. आता मनपाने पुन्हा मार्किंग केले आहे. हे मार्किंग करतानाही रस्त्याचा मध्य काढलेला नाही. उलट एकाच बाजूने जास्त प्रमाणात रस्ता दाखविला आहे. मनपाने हा रस्ता रद्द करावा, अशी मागणी पीटर सुधाकर बत्तीसे, संदीप आरसूड, रमेश इंगळे, सय्यद शाकेर आदींनी केली आहे.अधिकारी गप्प...मनपाच्या नगररचना विभागातर्फे शनिवारी या ठिकाणी मार्किंग करण्यात आली. मात्र याविषयी नगररचना विभागातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. दुसरीकडे वारंवार प्रयत्न करूनही सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.