शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

विजेच्या कमी-अधिक दाबाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.

जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.घायाळनगर हे जालना शहराच्या मध्यवस्तीत आहे. गत महिन्यात वादळी वाऱ्यात गांधीचमनवरील खांब कोसळला होता. तो दुरूस्त करण्यात आला आहे. परंतु तेव्हापासून घायाळनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. या वीजपुरवठ्याबाबत येथील नागरिकांनी दोनवेळा लेखी तक्रार गांधीचमन येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दिली आहे. शिवाय दूरध्वनीवरूनही याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना दिलेली आहे. परंतु यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या कमी अधिक दाबाने विद्युत पंप चालत नाहीत.त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना पाणी आले तरी नळावरील मोटारीही चालत नाहीत. याशिवाय विजेवर आधारित उपकरणे जळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूरदर्शनसंच, फ्रीज, पंखे, मिक्सर, लाईट आदी जळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विनाकारण भूर्दंड मात्र, नागरिकांना सहन करावा लागत आहे. कडक उन्हाच्या दिवसात कुलर, पंखे असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू म्हणून राहिले आहेत.वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून ही समस्या, अशी मागणी पंढरीनाथ चौधरी, प्रविण फुके, लक्ष्मणराव तारो, कोलते, झुंबड, शिंगणे, बुलबुले, विष्णू काळे आदींसह घायाळनगरवासियांनी एका निवेदनाद्वार केली आहे.