शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या कमी-अधिक दाबाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.

जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.घायाळनगर हे जालना शहराच्या मध्यवस्तीत आहे. गत महिन्यात वादळी वाऱ्यात गांधीचमनवरील खांब कोसळला होता. तो दुरूस्त करण्यात आला आहे. परंतु तेव्हापासून घायाळनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. या वीजपुरवठ्याबाबत येथील नागरिकांनी दोनवेळा लेखी तक्रार गांधीचमन येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दिली आहे. शिवाय दूरध्वनीवरूनही याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना दिलेली आहे. परंतु यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या कमी अधिक दाबाने विद्युत पंप चालत नाहीत.त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना पाणी आले तरी नळावरील मोटारीही चालत नाहीत. याशिवाय विजेवर आधारित उपकरणे जळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूरदर्शनसंच, फ्रीज, पंखे, मिक्सर, लाईट आदी जळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विनाकारण भूर्दंड मात्र, नागरिकांना सहन करावा लागत आहे. कडक उन्हाच्या दिवसात कुलर, पंखे असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू म्हणून राहिले आहेत.वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून ही समस्या, अशी मागणी पंढरीनाथ चौधरी, प्रविण फुके, लक्ष्मणराव तारो, कोलते, झुंबड, शिंगणे, बुलबुले, विष्णू काळे आदींसह घायाळनगरवासियांनी एका निवेदनाद्वार केली आहे.