शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

विविध प्रमाणपत्रे मिळणार सर्कलमध्येच

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते.

जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन किंवा महासेतू केंद्र गाठून प्रमाणपत्रांसाठी ताटकळत बसावे लागते. परंतु जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक बुधवारी किमान दोन सर्कलमध्ये अशा प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे ठरविले आहे.जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते. जात प्रमाणपत्र, रहिवासी, इन्कमटॅक्स, सातबारा, जन्म-मृत्यू इत्यादी प्रकारचे प्रमाणपत्र वेळेवर मिळणे गरजेच असते. त्यासाठी ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. ग्रामस्थांना आता आपल्या गावात, गावाजवळच प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधीच्या सूचना केल्या. काही प्रमाणपत्र वितरणाच्या ठिकारी जिल्हाधिकारी नायक हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. विविध प्रकारची प्रमाणपत्रे महासेतू, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालय असा प्रवास केल्यानंतरच मिळतात. जालन्याच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी गेल्या महिन्यात लाभार्थ्यांना एकाच दिवशी कार्यालयात बोलावून जात प्रमाणत्रांचे वितरण केले होते. अशाच प्रकारे प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. (प्रतिनिधी)