शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

विविध प्रमाणपत्रे मिळणार सर्कलमध्येच

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते.

जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन किंवा महासेतू केंद्र गाठून प्रमाणपत्रांसाठी ताटकळत बसावे लागते. परंतु जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक बुधवारी किमान दोन सर्कलमध्ये अशा प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे ठरविले आहे.जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते. जात प्रमाणपत्र, रहिवासी, इन्कमटॅक्स, सातबारा, जन्म-मृत्यू इत्यादी प्रकारचे प्रमाणपत्र वेळेवर मिळणे गरजेच असते. त्यासाठी ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. ग्रामस्थांना आता आपल्या गावात, गावाजवळच प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधीच्या सूचना केल्या. काही प्रमाणपत्र वितरणाच्या ठिकारी जिल्हाधिकारी नायक हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. विविध प्रकारची प्रमाणपत्रे महासेतू, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालय असा प्रवास केल्यानंतरच मिळतात. जालन्याच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी गेल्या महिन्यात लाभार्थ्यांना एकाच दिवशी कार्यालयात बोलावून जात प्रमाणत्रांचे वितरण केले होते. अशाच प्रकारे प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. (प्रतिनिधी)