शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शहीदांच्या स्मृती जागविणारा चौक

By admin | Updated: August 9, 2014 00:29 IST

परभणी: शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला

परभणी: शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या क्रांती चौकात शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला असून, हुतात्म्यांच्या कार्याचे स्मरण देतानाच नव्या पिढीला स्फुर्ती मिळत आहे.मराठवाडा मुक्ती संग्रामात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले. निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेकांनी कारावास भोगला. अनेकांनी भूमिगत राहून लढा दिला. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. आर. बी. देशपांडे, मुकुंदराव पेडगावकर, मनोहरराव खेडकर, श्रीनिवासराव बोरीकर, गोविंदराव नानल अशी किती तरी नावे घेता येतील ज्यांनी या लढ्यासाठी आपले सर्वस्व दिले. शहरातील क्रांती चौकातूनच या स्वातंत्र्य सैनिकांची रणनीती ठरायची. याच ठिकाणी योजना आखल्या जायच्या. विशेष म्हणजे याच चौकात बैठका झाल्या आणि याच चौकातून अनेकांना कारावासही भोगावा लागला. माजी आ. आर. बी. देशपांडे यांना येथूनच कारावासात जावे लागले होते. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात क्रांती चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आठवणी जागृत ठेवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण, अण्णासाहेब गव्हाणे यांच्या उपस्थितीत १९७६ मध्ये या ठिकाणी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला. भाजी मार्केट परिसरात हा स्मृती स्तंभ असल्याने परिसर अस्वच्छ बनला होता. स्तंभाशेजारीच विक्रेते त्यांचे साहित्य ठेवत. त्यामुळे या स्मृती स्तंभाची अवहेलनाच होत होती. हा स्मृती स्तंभ म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलीदानाची आठवण करुन देणारा, क्रांतीच्या स्मृती तेवत ठेवणारा स्तंभ आहे. परंतु त्याच स्तंभाची दुरवस्था होत असल्याने येथील बालनाथ देशपांडे यांनी या चौकाचे आणि स्मृतीस्तंभाचे वैभव जपले जावे यासाठी एकाकी लढा दिला. शासन दरबारी या स्तंभाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुंबई येथील आयुक्तांना वेळोवेळी निवेदने देऊन आणि पाठपुरावा करुनही त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे बालनाथ देशपांडे यांनी स्तंभाच्या ठिकाणीच बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणही सुरू केले. त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दखल या ठिकाणी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच हे उपोषण मागे घेण्यात आले. सध्या हा स्मृती स्तंभ आणि चौकाचे सुशोभिकरण झाले असून, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम या स्तंभाच्या माध्यमातून होत आहे.