शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

यशस्वी होण्यासाठी योग्य करिअर निवडावे

By admin | Updated: December 20, 2015 23:56 IST

औरंगाबाद : ‘मुलांना गणिताची सूत्रे शिकविताना फक्त ठराविक आकडे सूत्रात टाकून ते चालवायला न शिकविता, ते सूत्र तेथे का आले? त्याचा वापर कसा करावा,

औरंगाबाद : ‘मुलांना गणिताची सूत्रे शिकविताना फक्त ठराविक आकडे सूत्रात टाकून ते चालवायला न शिकविता, ते सूत्र तेथे का आले? त्याचा वापर कसा करावा, याबाबत माहिती द्या. मुलांना जर सगळे आयते पुरवत गेलात तर त्याचा ‘रोबोट’ होईल, पण जर त्याला त्या गोष्टीमागची संकल्पना समजावून दिली तर तो ‘स्मार्ट’ बनेल’, असे मत संकल्प फाऊंडेशनचे संचालक रजत पाणी यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. लोकमत कॅम्पस क्लब आणि संकल्प फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोकमत भवन येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘फाऊंडेशन कोर्सेस तुमच्या मुलाला काय बनवणार? ‘इंटेलिजेन्ट रोबोट’ की ‘स्मार्ट ह्युमन’ याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधताना रजत पाणी म्हणाले, मुलांना मासा हातात न देता, तो कसा पकडावा याबाबत माहिती द्या. रट्टा मारायला न शिकविता मुलांची कल्पनाशक्ती विकसित करणे ही आजच्या काळाची गरज आहे. मुलांची आवड कशात आहे, हे ओळखून त्यांना त्यांच्या आवडीचे करिअर शोधण्यासाठी मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. आपला मुलगा विज्ञान शाखेत न जाता कला शाखेकडे जात असल्यास मुलाला त्यासाठी प्रोत्साहन द्या. सगळे जात आहेत म्हणून आपणही बळजबरीने आपल्या पाल्याला त्या दिशेने पाठविणे योग्य नाही. त्याला त्याच्या आवडीचे क्षेत्र न मिळाल्यास मुलांची प्रगती होणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवस्थापन, समाजशास्त्र, कलाक्षेत्र, कायदेविषयक अभ्यास इ. क्षेत्रांविषयी त्यांनी मुलांना माहिती दिली. या विषयांवरील चांगले अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहेत, त्याची प्रवेश परीक्षा आणि अभ्यासक्रम याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. संकल्प फाऊंडेशनचे समूह संचालक आकाश जाधव यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती देताना जाधव यांनी बोर्ड अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यांच्यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. संकल्प फाऊंडेशनचे श्रेयांश दुग्गर यांनी येणाऱ्या संधींचा फायदा घेण्याचा अनमोल सल्ला विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले, ‘इयत्ता ७ वी ते १० वी हा आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, ते समजून घेण्यासाठीचा योग्य काळ आहे. आजचे पालक मुलांना काय करायचे आहे, ते समजून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुमच्या आवडींविषयी पालकांना मोकळेपणाने सांगा. या वयात वेगवेगळ्या गोष्टींना अजमावून पाहा.’ सचिन तेंडुलकर, ए. आर. रेहमान आदींची उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीलाच आपले करिअर बनविण्याचा सल्ला दिला. ‘क्षेत्र कोणतेही निवडा, पण जे निवडाल त्यात सर्वाेच्च पदावर जा’ असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला लोकमतचे सहायक उपाध्यक्ष शैलेश चांदीवाल तसेच वरिष्ठ व्यवस्थापक (आय. टी.) विलास झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. लोकमत आणि संकल्प फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘लिटमस टेस्ट-२०१५’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : इयत्ता ९ वी- प्रथम- निशा जोशी- एसबीओए शाळा द्वितीय- प्रथमेश प्रधान- एसबीओए शाळा तृतीय- अन्विशा मुगल- वाय. एस. खेडकर इयत्ता ८ वी- प्रथम- विवेक वीर - देवगिरी ग्लोबल अकॅडमी द्वितीय- अभा दुर्गपुरोहित- बीएसजीएम स्कूल तृतीय - रोहित आरोळे - नाथ व्हॅली इयत्ता ७ वी- प्रथम- गौरव कासलीवाल- अग्रसेन विद्यामंदिर द्वितीय- विराज रोडगे- स्टेपिंग स्टोन्स स्कूल तृतीय- प्रथम कलगुटकर - देवगिरी ग्लोबल अकॅडमी प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब्लेट देण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळ देण्यात आले.