शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

चिमुकल्यांना सुटीचा मूड कायम, अभ्यासाचा विसर, पालकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होताना पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी ...

---

औरंगाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होताना पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली नाहीत. ऑनलाइन शिक्षणामुळे पहिली ते चाैथीचे चिमुकली अद्याप उन्हाळी सुट्यांच्या फीवरमधून बाहेर पडली नसल्याने पालकांना चिंता सतावू लागली आहे. शाळा बंद असल्याने सुटीच्या मूडमधून चिमुकली बाहेर पडली नसल्याने विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहील, अशी पालकांना भीती वाटते.

अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच मिळालेले नाहीत. ब्रीज कोर्स सुरू झाला मात्र, त्याच्या पीडीएफ फाइलच्या प्रिंट पुस्तकांपेक्षा महागात पडत असल्याने परवडण्याऱ्या नाहीत. ग्रामीण भागातील समस्या त्याहीपेक्षा वेगळ्या आहेत. एका घरात एकच मोबाइल. त्यावर मोठी भावंडे शिकतील की लहान, अनेकांकडे ॲण्ड्राइड मोबाइल नाहीत. रेंजच्या अडचणी, त्यात ऑनलाइनला प्रत्यक्षात ४० टक्केही मुलांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे शिक्षकांसाठी आव्हान ठरत आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकताना एकत्र कविता, प्रार्थना, अक्षर, अंक, प्राणी, पक्ष्यांची तोंडओळख सोपी होते. गेल्या वर्षी पहिलीतील विद्यार्थी थेट दुसरीत गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती शिक्षकांसह पालकांतून व्यक्त होत आहे.

---

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

-कुणीतरी आले, पाणी प्यायचे, भूक लागली, झोप येतेय अशी कारणे चिमुकली देत आहेत.

-ऑनलाइन वर्गाचा अभ्यास दिल्यावर थोडावेळ खेळतो, कार्टून पाहून लगेच अभ्यास करतो, असे म्हणून टाळाटाळ करतात.

-मोबाइल जवळ असल्यावर क्लासची विंडोसोबत गेमची विंडो सुरू करतात. त्यामुळे वर्गापेक्षा खेळावर विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त असते.

-पूर्वी चार ते पाच तास शाळेत घालवणारी मुले आता तासभर एका जागी बसून एकाग्रतेने अभ्यासाला कंटाळा करतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

----

आपल्या घरातूनच अभ्यास बरा

---

कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. या कारणास्तव शाळा ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. आणखी काही महिने तरी ऑनलाइन शिकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कामांतून, गोष्टींतून, गप्पांतून नवीन संकल्पनेने विषय समजावून द्यावेत. दैनंदिन कामातून आकडेमोड आणि अक्षर ओळख करून द्यावी. सहज बोलताना गाणी, कविता म्हणून घ्याव्यात आणि त्यांना अभ्यासाचे धडे द्यावेत, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

----

पालकांची अडचण वेगळी

--

कार्यालयीन ऑनलाइन बैठका, त्याच वेळी विद्यार्थ्यांचे वर्ग यातून पाल्य ऑनलाइन वर्गात काय करतोय यावर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तिकडे पूर्णवेळ लक्ष दिले तर इतर कामांकडे दुर्लक्ष होत आहे.

- दिलीप सपकाळ, पालक

----

शेतीची कामे सुरू झाल्याने घरी मुलांजवळ कुणाला तरी एकाला थांबावे लागते. शेतात मुलांना नेऊ शकत नाही. तिथे ते शिकण्यापेक्षा इतरत्र धिंगाना घालतात. लक्ष दिले नाही तर मोबाइलवर क्लास सोडून गेम्स खेळत बसतात.

-दीपाली पंडित, पालक

--

वर्गनिहाय विद्यार्थी

--

पहिली -८८,३२९

दुसरी -८८,१८९

तिसरी -८८,२०२

चौथी -८९,२११