शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

चिमुकल्यांना सुटीचा मूड कायम, अभ्यासाचा विसर, पालकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होताना पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी ...

---

औरंगाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होताना पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली नाहीत. ऑनलाइन शिक्षणामुळे पहिली ते चाैथीचे चिमुकली अद्याप उन्हाळी सुट्यांच्या फीवरमधून बाहेर पडली नसल्याने पालकांना चिंता सतावू लागली आहे. शाळा बंद असल्याने सुटीच्या मूडमधून चिमुकली बाहेर पडली नसल्याने विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहील, अशी पालकांना भीती वाटते.

अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच मिळालेले नाहीत. ब्रीज कोर्स सुरू झाला मात्र, त्याच्या पीडीएफ फाइलच्या प्रिंट पुस्तकांपेक्षा महागात पडत असल्याने परवडण्याऱ्या नाहीत. ग्रामीण भागातील समस्या त्याहीपेक्षा वेगळ्या आहेत. एका घरात एकच मोबाइल. त्यावर मोठी भावंडे शिकतील की लहान, अनेकांकडे ॲण्ड्राइड मोबाइल नाहीत. रेंजच्या अडचणी, त्यात ऑनलाइनला प्रत्यक्षात ४० टक्केही मुलांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे शिक्षकांसाठी आव्हान ठरत आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकताना एकत्र कविता, प्रार्थना, अक्षर, अंक, प्राणी, पक्ष्यांची तोंडओळख सोपी होते. गेल्या वर्षी पहिलीतील विद्यार्थी थेट दुसरीत गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती शिक्षकांसह पालकांतून व्यक्त होत आहे.

---

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

-कुणीतरी आले, पाणी प्यायचे, भूक लागली, झोप येतेय अशी कारणे चिमुकली देत आहेत.

-ऑनलाइन वर्गाचा अभ्यास दिल्यावर थोडावेळ खेळतो, कार्टून पाहून लगेच अभ्यास करतो, असे म्हणून टाळाटाळ करतात.

-मोबाइल जवळ असल्यावर क्लासची विंडोसोबत गेमची विंडो सुरू करतात. त्यामुळे वर्गापेक्षा खेळावर विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त असते.

-पूर्वी चार ते पाच तास शाळेत घालवणारी मुले आता तासभर एका जागी बसून एकाग्रतेने अभ्यासाला कंटाळा करतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

----

आपल्या घरातूनच अभ्यास बरा

---

कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. या कारणास्तव शाळा ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. आणखी काही महिने तरी ऑनलाइन शिकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कामांतून, गोष्टींतून, गप्पांतून नवीन संकल्पनेने विषय समजावून द्यावेत. दैनंदिन कामातून आकडेमोड आणि अक्षर ओळख करून द्यावी. सहज बोलताना गाणी, कविता म्हणून घ्याव्यात आणि त्यांना अभ्यासाचे धडे द्यावेत, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

----

पालकांची अडचण वेगळी

--

कार्यालयीन ऑनलाइन बैठका, त्याच वेळी विद्यार्थ्यांचे वर्ग यातून पाल्य ऑनलाइन वर्गात काय करतोय यावर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तिकडे पूर्णवेळ लक्ष दिले तर इतर कामांकडे दुर्लक्ष होत आहे.

- दिलीप सपकाळ, पालक

----

शेतीची कामे सुरू झाल्याने घरी मुलांजवळ कुणाला तरी एकाला थांबावे लागते. शेतात मुलांना नेऊ शकत नाही. तिथे ते शिकण्यापेक्षा इतरत्र धिंगाना घालतात. लक्ष दिले नाही तर मोबाइलवर क्लास सोडून गेम्स खेळत बसतात.

-दीपाली पंडित, पालक

--

वर्गनिहाय विद्यार्थी

--

पहिली -८८,३२९

दुसरी -८८,१८९

तिसरी -८८,२०२

चौथी -८९,२११