शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना सुटीचा मूड कायम, अभ्यासाचा विसर, पालकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होताना पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी ...

---

औरंगाबाद : जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होताना पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली नाहीत. ऑनलाइन शिक्षणामुळे पहिली ते चाैथीचे चिमुकली अद्याप उन्हाळी सुट्यांच्या फीवरमधून बाहेर पडली नसल्याने पालकांना चिंता सतावू लागली आहे. शाळा बंद असल्याने सुटीच्या मूडमधून चिमुकली बाहेर पडली नसल्याने विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहील, अशी पालकांना भीती वाटते.

अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच मिळालेले नाहीत. ब्रीज कोर्स सुरू झाला मात्र, त्याच्या पीडीएफ फाइलच्या प्रिंट पुस्तकांपेक्षा महागात पडत असल्याने परवडण्याऱ्या नाहीत. ग्रामीण भागातील समस्या त्याहीपेक्षा वेगळ्या आहेत. एका घरात एकच मोबाइल. त्यावर मोठी भावंडे शिकतील की लहान, अनेकांकडे ॲण्ड्राइड मोबाइल नाहीत. रेंजच्या अडचणी, त्यात ऑनलाइनला प्रत्यक्षात ४० टक्केही मुलांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्र करणे शिक्षकांसाठी आव्हान ठरत आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकताना एकत्र कविता, प्रार्थना, अक्षर, अंक, प्राणी, पक्ष्यांची तोंडओळख सोपी होते. गेल्या वर्षी पहिलीतील विद्यार्थी थेट दुसरीत गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहण्याची भीती शिक्षकांसह पालकांतून व्यक्त होत आहे.

---

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

-कुणीतरी आले, पाणी प्यायचे, भूक लागली, झोप येतेय अशी कारणे चिमुकली देत आहेत.

-ऑनलाइन वर्गाचा अभ्यास दिल्यावर थोडावेळ खेळतो, कार्टून पाहून लगेच अभ्यास करतो, असे म्हणून टाळाटाळ करतात.

-मोबाइल जवळ असल्यावर क्लासची विंडोसोबत गेमची विंडो सुरू करतात. त्यामुळे वर्गापेक्षा खेळावर विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त असते.

-पूर्वी चार ते पाच तास शाळेत घालवणारी मुले आता तासभर एका जागी बसून एकाग्रतेने अभ्यासाला कंटाळा करतात, असे पालकांचे म्हणणे आहे.

----

आपल्या घरातूनच अभ्यास बरा

---

कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असला तरी धोका टळलेला नाही. या कारणास्तव शाळा ही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. आणखी काही महिने तरी ऑनलाइन शिकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कामांतून, गोष्टींतून, गप्पांतून नवीन संकल्पनेने विषय समजावून द्यावेत. दैनंदिन कामातून आकडेमोड आणि अक्षर ओळख करून द्यावी. सहज बोलताना गाणी, कविता म्हणून घ्याव्यात आणि त्यांना अभ्यासाचे धडे द्यावेत, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

----

पालकांची अडचण वेगळी

--

कार्यालयीन ऑनलाइन बैठका, त्याच वेळी विद्यार्थ्यांचे वर्ग यातून पाल्य ऑनलाइन वर्गात काय करतोय यावर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तिकडे पूर्णवेळ लक्ष दिले तर इतर कामांकडे दुर्लक्ष होत आहे.

- दिलीप सपकाळ, पालक

----

शेतीची कामे सुरू झाल्याने घरी मुलांजवळ कुणाला तरी एकाला थांबावे लागते. शेतात मुलांना नेऊ शकत नाही. तिथे ते शिकण्यापेक्षा इतरत्र धिंगाना घालतात. लक्ष दिले नाही तर मोबाइलवर क्लास सोडून गेम्स खेळत बसतात.

-दीपाली पंडित, पालक

--

वर्गनिहाय विद्यार्थी

--

पहिली -८८,३२९

दुसरी -८८,१८९

तिसरी -८८,२०२

चौथी -८९,२११