शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

केळगाव, धावडा परिसरात मिरची लागवडीने घेतला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:02 IST

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, केळगाव, धावडा परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून मिरचीकडे वळू लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा ...

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, केळगाव, धावडा परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून मिरचीकडे वळू लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा मिरची पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. काही शेतकरी मिरची लागवडीसाठी आपल्याकडील असलेल्या पाण्याचा अंदाज घेऊन मिरचीची लागवड करीत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पारंपरिक पिकातील मका, कपाशीच्या लागवडीचा खर्च देखील निघाला नाही. मिरची या नगदी पिकामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दोन ते अडीच महिन्यात उत्पन्नाला सुरुवात होत असल्यामुळे मागच्या वर्षी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात काही प्रमाणात का होईना मिरची लागवडीकडे वळला होता. यावर्षी देखील शेतकरी मिरची लागवडीकडे पुन्हा वळला आहे. मिरची लागवड करण्यासाठी रोपेसुद्धा परिसरातील रोपवाटिकेतून शेताच्या बांधावर मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मिरची लागवडीला सुरुवात झाली आहे.

कमी क्षेत्रात कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळायला सुरुवात झाल्याने लोक मिरची लागवडीकडे वळाले आहेत. ठिबक सिंचनचा वापर करून कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळत आहे. येत्या काळात मिरची पिकाला भाव राहणार का नाही अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. - बाळासाहेब इवरे, व्यापारी,

मल्चिंग पेपरचा वापर करून शेतकरी मिरचीची लागवड करीत आहे. याचा फायदा मिरची लागवड केल्यानंतर पाणी कमी प्रमाणात लागते. गवत होत नाही. मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. - काकासाहेब कोल्हे, शेतकरी, केळगाव

फोटो : केळगाव येथील दत्तू मुळे यांच्या शेतातील मिरची लागवड करण्यात सुरुवात झालेली आहे.

फोटो : मिरचीचे रोपे नर्सरीतून थेट शेताच्या बांधावर दिली जात आहेत.