शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जननी-शिशु सुरक्षा योजनेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

रविंद्र भताने , चापोली आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय बाळंतीण महिला आणि नवजात शिशुच्या चांगल्या आरोग्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जननी-शिशु सुरक्षा योजनेचे नवे धोरण अतिशय कीचकट आहे.

रविंद्र भताने , चापोलीआर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय बाळंतीण महिला आणि नवजात शिशुच्या चांगल्या आरोग्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जननी-शिशु सुरक्षा योजनेचे नवे धोरण अतिशय कीचकट असून, केवळ ७०० रुपये अनुदान घेण्यासाठी बाळंतीण महिलेला ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे चापोली परिसरात या योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.शासनातर्फे नागरिकांच्या कल्याणासाठी नवनव्या योजना अस्तित्वात आणल्या जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे जननी-शिशु सुरक्षा योजना आहे. शासनाने अनुसूचित जाती-जमातीतील गरीब कुटुंबातील बाळंतीण महिला व तिच्या नवजात बाळाला योग्य आहार मिळावा म्हणून ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेचे बाळंतपण सामान्य झाल्यास ७०० रुपये तर बाळंतपणासाठी शस्त्रक्रिया (सिझेरियन) करावी लागल्यास १५०० रुपये अनुदान त्या महिलेस देण्यात येते. सुरुवातीस हे अनुदान बाळंतीण महिलेस रोख स्वरूपात देण्यात येत होते. त्यानंतर शासनाने त्यात थोडी सुधारणा केली आणि सदर योजनेचे अनुदान लाभार्थी महिलेस बेरर चेकच्या स्वरूपात देणे सुरू केले. बेरर चेक नावे असलेली व्यक्ती आपले ओळखपत्र देऊन सहज अनुदानाचा लाभ घेत होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शासनाने बेरर चेक देण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी अकाऊंट पेयी चेक देण्याची पद्धत सुरू केली आहे. या पद्धतीनुसार लाभार्थी महिलेला मिळालेला अकाऊंट पेयी चेक वटविण्यासाठी स्वत:च्या नावे बँकेत खाते उघडावे लागते. गंमत म्हणजे ७०० रुपयांचे अनुदान घेण्यासाठी ५०० रुपये खर्च करून बँक खाते उघडावे लागत आहे. त्यामुळे ‘आठ आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशीच ही पद्धत झाल्याचे बोलले जात आहे. आज प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तसेच रोख रक्कम किंवा बेरर चेकद्वारे दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे शासनाने अकाऊंट पेयी चेक देण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बँकेने महिलांचे खाते झीरो बजेटवर काढावे, असे आदेशही उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. बँकेने जर सहकार्य केले तर या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळेल, असे चाकूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राम शेटे यांनी सांगितले़