शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘बालकामगार मुलांनी उच्च पदावर जावे’

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जालना: बालकामगार मुलांनी बालमजुरी सोडून शिक्षण घेवून मोठ्या पदावर जावे, असे प्रतिपादन बाल न्यायमंडळाच अध्यक्षा तथा कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायाधीश जे.एस.भाटीया यांनी आयोजित कार्यक्रमात केले.

जालना: बालकामगार मुलांनी बालमजुरी सोडून शिक्षण घेवून मोठ्या पदावर जावे, आपल्या कामातून इतर बालकांसमोर आदर्श निर्माण करावेत, असे प्रतिपादन बाल न्यायमंडळाच अध्यक्षा तथा कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायाधीश जे.एस.भाटीया यांनी आयोजित कार्यक्रमात केले.जागतिक कामगार विरोधी दिनानिमित्त गुरूवारी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत शंकर नगर येथील समाज कल्याण वसतिगृहाजवळून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. या रॅलीची सांगता शनिमंदिर येथे झाली. या रॅलीमध्ये बालकामगार प्रथेविरूध्द व बालकामगार प्रतिबंध कायद्यातील पत्रकाचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी घोषणावाक्याचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले.शंकरनगर येथील विशेष प्रशिक्षण केंद्रात बालकामगार विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी बालकामगार विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुढील काळात शासकीय योजनांचा फायदा बालकामगार विद्यार्थ्यांना करून देण्यात येईल असे सांगितले.प्रारंभी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात सुमारे ३३५ विद्यार्थी व १७२ राष्ट्रीय बालकामगार, प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा राठोड यांनी केले व क्षेत्रीय अधिकारी रेणुका चव्हाण यांनी आभार मानले.या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, डायटचे अधिव्याख्याता डॉ.विशाल तायडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती इंगळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, सीटूचे अध्यक्ष अण्णा सावंत, यांच्यासह सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाटीया यांचे आवाहनप्रकल्पाच्या माध्यमातून शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करून दहावी व बारावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते शालेय साहित्य देवून सत्कार करण्यात आला.