शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘बालकामगार मुलांनी उच्च पदावर जावे’

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जालना: बालकामगार मुलांनी बालमजुरी सोडून शिक्षण घेवून मोठ्या पदावर जावे, असे प्रतिपादन बाल न्यायमंडळाच अध्यक्षा तथा कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायाधीश जे.एस.भाटीया यांनी आयोजित कार्यक्रमात केले.

जालना: बालकामगार मुलांनी बालमजुरी सोडून शिक्षण घेवून मोठ्या पदावर जावे, आपल्या कामातून इतर बालकांसमोर आदर्श निर्माण करावेत, असे प्रतिपादन बाल न्यायमंडळाच अध्यक्षा तथा कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायाधीश जे.एस.भाटीया यांनी आयोजित कार्यक्रमात केले.जागतिक कामगार विरोधी दिनानिमित्त गुरूवारी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत शंकर नगर येथील समाज कल्याण वसतिगृहाजवळून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. या रॅलीची सांगता शनिमंदिर येथे झाली. या रॅलीमध्ये बालकामगार प्रथेविरूध्द व बालकामगार प्रतिबंध कायद्यातील पत्रकाचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी घोषणावाक्याचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले.शंकरनगर येथील विशेष प्रशिक्षण केंद्रात बालकामगार विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी बालकामगार विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुढील काळात शासकीय योजनांचा फायदा बालकामगार विद्यार्थ्यांना करून देण्यात येईल असे सांगितले.प्रारंभी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात सुमारे ३३५ विद्यार्थी व १७२ राष्ट्रीय बालकामगार, प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा राठोड यांनी केले व क्षेत्रीय अधिकारी रेणुका चव्हाण यांनी आभार मानले.या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, डायटचे अधिव्याख्याता डॉ.विशाल तायडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती इंगळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, सीटूचे अध्यक्ष अण्णा सावंत, यांच्यासह सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाटीया यांचे आवाहनप्रकल्पाच्या माध्यमातून शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करून दहावी व बारावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते शालेय साहित्य देवून सत्कार करण्यात आला.