शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धारूरमध्ये उपचाराअभावी बालकाचा मृत्यू

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

धारूर: येथील ग्रामीण रूग्णालयात एका १२ वर्षीय मुलास उपचार न मिळाल्यामुळे त्यास अंबाजोगाई येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

धारूर: येथील ग्रामीण रूग्णालयात एका १२ वर्षीय मुलास उपचार न मिळाल्यामुळे त्यास अंबाजोगाई येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या कारभारावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.शिवम महारूद्र पोटभरे असे त्या बालकाचे नाव आहे. तो शहरातील झोपडपट्टी भागातील रहिवाशी होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे घराजवळच असलेल्या ग्रामीण रूग्णालयात कुटुंबियांनी त्याला दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाईला घेऊन जा, असे दवाखान्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक परत आले. त्यांनी या बालकाच्या मृत्यूसाठी डॉक्टर व कर्मचारी दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. रूग्णालयात मोठा जमाव जमा झाला होता.या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त कुटुंबियांनी केली. यामुळे येथील सर्व कामकाज ठप्प पडले होते. केज ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक थोरात हे तेथे दाखल झाले. त्यांनी या लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. वरिष्ठांना अहवाल पाठवून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. (वार्ताहर)धारूर ग्रामीण रूग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी असून इतर पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील व्यवस्थापन ढासळलेले आहे. परिणामी, रूग्णांचे मोठे हाल होत आहेत. याही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.