शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

एमआयएमकडून मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : दरवर्षी १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शहरात येतात ध्वजारोहण करून, भाषण देऊन निघून जातात. मागील ...

औरंगाबाद : दरवर्षी १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शहरात येतात ध्वजारोहण करून, भाषण देऊन निघून जातात. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मराठवाड्याला आजपर्यंत राज्यकर्त्यांनी काय दिले, तर काहीच नाही. मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत आज एमआयएम पक्षाकडून करण्यात आले. चिकलठाणा विमानतळापासून सिद्धार्थ उद्यानापर्यंत कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विकासकामांचे फलक दाखवून पुष्पवृष्टी केली.

मराठवाड्याचा आजपर्यंत सर्वांगीण विकास झाला नाही. विकासाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढतोय. विकासासाठी मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्यापेक्षा त्यांचे उपहासात्मक स्वागत करण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी खा. इम्तियाज जलील यांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी विमानतळ, अदालत रोड, महावीर चौक, सिद्धार्थ उद्यान येथे एमआयएम कार्यकर्ते विकासकामांचे फलक घेऊन उभे होते. मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. कार्यकर्त्यांना अटक करून सिडको पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नंतर त्यांना सोडून दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष समीर अब्दुल साजेद, शहराध्यक्ष शहारेख नक्षबंदी, माजी जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, माजी नगरसेवक जमीर कादरी, नासेर सिद्दीकी, गंगाधर ढगे, शेख अजीम, फेरोज खान यांच्यासह रफत यारखान, रफीक चिता, आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

प्रसार माध्यमांसोबत बोलताना खा. इम्तिया जलील यांनी सांगितले की, मराठवाड्यातून दरवर्षी ६ हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जातात. त्या तुलनेत मराठवाड्यातील विकासकामांसाठी फक्त ६३३ कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेण्यात आले. रस्त्यांवर आजही खड्डेच खड्डे आहेत. नळांना स्वच्छ पाणी येत नाही. अनुशेष भरून काढण्याबाबत सरकार काहीच बोलत नाही, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद येथील कार्यक्रमात क्रीडा विद्यापीठाच्या मुद्यावर मुंबईला या. तेथे हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिल्याचे जलील यांनी सांगितले.